Thursday, February 5, 2026
HomeनगरLeopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू, दोन वर्षांत १३ गायींचा बळी

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू, दोन वर्षांत १३ गायींचा बळी

पाथर्डी (प्रतिनिधी)

तालुक्यातील करंजी गावाजवळील भटेवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे यांची तथागत देशी गायींची गोशाळा आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गोशाळेत सध्या ६७ गायी आहेत. मात्र, या परिसरात बिबट्याचा सतत वावर असल्याने गोशाळेवर धोक्याचे सावट आहे. मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने गोशाळेतील एका गाईवर हल्ला केला, ज्यामुळे त्या गाईचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांत या गोशाळेतील तब्बल १३ गायी बिबट्याच्या हल्ल्यात मारल्या गेल्या आहेत. भटेवाडी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून, यापूर्वीही असे हल्ले झाले आहेत. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्याची मागणी केली आहे. क्षेत्रे यांनी देखील वन विभागाशी याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला, पण त्यांना अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही.

YouTube video player

दोन वर्षांत १३ गायींचा मृत्यू झाला, तरी वन विभागाने क्षेत्रे यांना एकदाही नुकसान भरपाई दिलेली नाही. गाईंवर हल्ला झाल्यानंतर बिबट्याचे पायांचे ठसे आणि इतर पुरावे वन विभागाला सादर केले गेले. मात्र, वन विभागाकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे क्षेत्रे यांच्यासमोर आर्थिक आणि मानसिक संकट उभे ठाकले आहे.

छानराज क्षेत्रे गेल्या दहा वर्षांपासून स्वखर्चाने गोशाळा चालवत आहेत. देशी गायींचे संगोपन करताना त्यांनी अनेक अडचणींवर मात केली. पण बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे गोशाळेतील गायींची सुरक्षा धोक्यात आली आहे. “एवढ्या मोठ्या संख्येने गायी स्वखर्चाने किती दिवस सांभाळायच्या?” असा प्रश्न क्षेत्रे यांनी उपस्थित केला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यांमुळे भटेवाडी परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. “जर वन विभागाने वेळीच कारवाई केली असती, तर मंगळवारी गाईचा जीव वाचला असता,” अशी खंत क्षेत्रे यांनी व्यक्त केली. वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे गोमातेच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

गेल्या दहा वर्षांपासून छानराज क्षेत्रे स्वतःच्या खिशातून गोशाळा चालवत देशी गायींचे संरक्षण करत आहेत. मात्र, जंगलात भटकणाऱ्या बिबट्याने दोन वर्षांत १३ गायींची शिकार केली. यामुळे गोशाळेवर आर्थिक संकट कोसळले आहे. वन विभागाच्या नकारात्मक भूमिकेमुळे गायींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास गोशाळेचे भवितव्य धोक्यात येऊ शकते.

 

ताज्या बातम्या

Crime News : शिक्षिकेची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar टेलिग्रामवर हॉटेल रेटिंग व ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून खासगी महाविद्यालयातील शिक्षिकेची तब्बल 5 लाख 45 हजार 968...