Friday, May 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा

Maharashtra Politics : महायुतीकडून राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhansabha Election) निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर महायुतीमधून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी (CM) कुणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून महायुतीमध्ये (Mahayuti) सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार असून उद्या ते आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड

यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या तीनही नेत्यांनी यावेळी राज्यपालांना आपल्याला असणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले. त्यानंतर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी महायुती सरकारला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. त्यानुसार उद्या सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची (CM Post) शपथ घेणार आहेत.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “मी महाराष्ट्राच्या जनतेला…”; गटनेतेपदी निवड होताच फडणवीस नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, उद्या (दि.०५ डिसेंबर) रोजी आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह किती मंत्र्यांचा शपथविधी होईल याची माहिती संध्याकाळी दिली जाईल. तसेच काल एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मी त्यांना आपण सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी विंनती केली आहे. त्यामुळे ते आमच्या विनंतीचा मान ठेऊन सरकारमध्ये सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखेंच्या अध्यक्षतेखाली साई संस्थानच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकीय समिती स्थापन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनाचे नियंत्रण आणि कार्यान्वयन अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय समिती स्थापन करण्यासाठी साईबाबा संस्थानला कळवण्यात आले...