Tuesday, June 10, 2025
HomeनगरRahata : झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा - ना. विखे पाटील

Rahata : झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – ना. विखे पाटील

राहाता |प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

जिल्ह्यात मागील काही दिवसांत मोठ्या स्वरुपातील पावसाने झालेल्या नुकसानीचा विचार करता स्थायी आदेशाच्या पलिकडे जावून मदत करण्याचा विचार करावा लागणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे. झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, महावितरणाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणीनंतर अधिकार्‍यांसमवेत घेतलेल्या बैठकीत दिल्या.

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, राजुरी ममदापूर, तिसगाव वाडी, अस्तगावच्या काही भागांमध्ये चक्रीवादळ सदृश्य पावसाने या भागातील डाळिंब, आंबा, ऊस आणि साठवलेल्या कांद्याचे तसेच घरे, गोठ्यांवर झाडे पडून मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाला ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देऊन शेतकर्‍यांना दिलासा दिला. अधिकार्‍यांना सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देत सरकार हे नैसर्गिक संकटात शेतकर्‍यांसह नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

शनिवारी सायंकाळी बाभळेश्वर, राजुरी, ममदापूर, तिसगाव, अस्तगाव या भागामध्ये चक्री वादळाने फळबागा तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भाऊसाहेब विनायक म्हस्के यांची कांदा चाळ, डाळिंब उत्पादक राहुल सुरेश कसाब आणि डाळींबरत्न बी. टी. गोरे यांच्या डाळींब बागास थेट शेतात जाऊन या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. यावेळी प्रांतधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांच्यासह वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता उपस्थित होते.

ना. विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संवाद साधत सरकार आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. शासनाच्या वतीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी अडचणी आहेत मदत देण्यासाठी अडचणी आहेत या संदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

वातावरणात झालेल्या बदलाने नैसर्गिक चक्र पूर्णपणे बदलले आहे. काही दिवसांपुर्वी पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसाने एका दिवसात धरणात एक टिएमसी पाणी येणे हे सुध्दा घडू शकते. त्यामुळे नैसर्गिक परीस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. वादळी वार्‍याने या भागातील वीज पुरवठा दोन दिवसापासून बंद आहे. तो तातडीने सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकार्‍यांनी युध्द पातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश ना. विखे पाटील यांनी दिले. नैसर्गिक आपती असली तरी भविष्यात नुकसान कसे टाळता येऊ शकते यावरच उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येकाचा पंचनाम करून तातडीने अहवाल सादर करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पाहणी दरम्यान त्यांनी डाळिंब उत्पादकांशीही संवाद साधला अनेक भागांमध्ये डाळिंब उत्पादकांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरले आहे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकर्‍यांना उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. राहुल कसाब यांची फळभाग पूर्णपणे भुईसपाट झाली आहे. या बागेची पुन्हा बांधणी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याविषयी डाळिंबरत्न डॉ. बी. टी. गोरे यांच्याशी चर्चा करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आंबा, कांदा उत्पादकांना देखील या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. चाळीत असलेला कांदा आणि त्यावर पडलेल्या झाडांमुळे भिजलेल्या कांद्याचे पंचनामे अधिकार्‍यांनी करून अहवाल त्वरित पाठवण्याची सूचना त्यांनी केल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपूरच्या शिंदे सेनेत ‘म्यान एक तलवारी अनेक’

0
श्रीरामपूर |अशोक गाडेकर| Shrirampur शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे व शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली...