Sunday, April 19, 2026
HomeनगरSangamner : उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती गंभीर

Sangamner : उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती गंभीर

शिक्षण आयुक्तांना पत्रातून दिला धरणे आंदोलनाचा इशारा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पत्र दिले. उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याचे नमूद करत तत्काळ ठोस उपाययोजना न झाल्यास 25 मे, 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला.

- Advertisement -

सदर पत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार नाशिक पदवीधर मतदारसंघातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक आणि प्रशासन यांच्यात परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण यंत्रणा दिशाहीन झाल्याचे चित्र आहे. एसीआयटी चौकशीच्या नावाखाली लहानसहान कामेही प्रलंबित ठेवली जात असून प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

याशिवाय शिक्षण विभागातील अनेक प्रश्न हे आर्थिक नसून दैनंदिन प्रशासकीय कामकाजाशी संबंधित असतानाही वारंवार अर्थसंकल्पाचे कारण पुढे केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत शिक्षकांवर जनगणना, मतदार नोंदणी, बीएलओसारख्या विविध शासकीय कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या मुख्य कार्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणापेक्षा अहवाल, लेखापरीक्षण आणि पूरक कामांवर अधिक भर दिला जात असल्याची बाबही चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे तत्काळ अंतर्गत बैठक घेऊन सर्व प्रश्नांचा सखोल आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथेला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत व्यापक कारवाई करत 155 प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केला असून...