Friday, May 23, 2025
Homeनगरराज्यात युती सरकारकडून जातीपातीचे राजकारण - आ. थोरात

राज्यात युती सरकारकडून जातीपातीचे राजकारण – आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

सध्याचे सरकार हे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र अशा गोष्टींना थारा देत नाही. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील खांबे येथील कामधेनू उपसा सिंचन योजना कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर आदी मान्यवर उपस्थित होते.

अनेक वर्षापासून खांबे गावचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कामधेनू सिंचन योजनेचे आज आपण भूमिपूजन केले. ही योजना महाविकास आघाडी सत्तेवर असताना जलसंधारण विभागाकडून मंजुरी मिळाली होती. परंतू खोके सरकार आल्यानंतर सदरच्या योजना थांबविण्यात आल्या. सतत पाठपुरावा करून आज भूमिपूजन सुद्धा करतो आहे. आमचे सरकार सत्तेवर असताना राज्यातील शेतकर्‍यांसाठी व जनतेसाठी अनेक चांगल्या योजना अंमलात आणण्याचे काम केले होते. परंतू महायुती सरकारमुळे सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

कोणत्याही ठोस योजना न करता फक्त मतांची पोळी भाजण्याकरिता जातीपातीचे राजकारण व फोडाफोडीचे राजकारण करण्यापलीकडे या सरकारने अडीच वर्षात कोणतेही काम केले नाही. काही नेते मंजूर झालेल्या योजनांना अडचणी निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतु येणार्‍या काळात त्यांचा बंदोबस निश्चितपणे करू, असा इशारा आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला. प्रास्ताविक रामदास जोरी यांनी केले तर आभार विलास दातीर यांनी मानले.

तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आम्ही गाव सांभाळतो..
साहेबांना राज्याच्या जबाबदारी बरोबरच दिल्लीतही आदराचे स्थान असल्याने पक्षामध्ये त्यांच्या शब्दाला वजन आहे. येणार्‍या निवडणुकीत आपण आमदार बाळासाहेब थोरात यांना एक शब्द देऊ, की साहेब तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आम्ही गाव सांभाळतो. हा नारा देऊन सर्वांनी येणार्‍या निवडणुकीत मोठ्या ताकतीने आमदार थोरातांचे हात बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन डॉ. जयश्री थोरात यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अकरावी प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच दिवशी गोंधळ

0
संगमनेर |वार्ताहर| Sangamner राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ सोमवारपासून झाला असला, तरी संगमनेर-अकोलेमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशीच तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. संकेतस्थळावर अर्ज भरताना वारंवार...