मुंबई | Mumbai
कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. लोकलमधून पडून ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच काही गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडणीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या अपघातात ठाणे जीआरपीचे पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी हे दारात लटकत ऊभे होते. लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या दुसऱ्या लोकलला घासले गेले. त्यामुळे दारत असलेले प्रवासी खाली कोसळले आणि ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जीआरपी कर्मचारी विकी बाळासाहेब मुख्यादल यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विकी बाबासाहेब मुख्यादल असे मृत जीरआरपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विकी हे ठाणे जीआरपी पोलिसांत कार्यरत होते. ते नेमक्या कोणत्या लोकलमध्ये होते, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, या अपघातात चार प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नव्या लोकलला ऑटोमॅटिक डोअर क्लोजर
मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान झालेल्या अपघातानंतर रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील. तसेच 238 एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. या सर्व गाड्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत. आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावणार आहेत.
नेमके कशी घडली दुर्घटना?
रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना सकाळी अंदाजे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल आणि मुंबईहून कर्जतकडे येणाऱ्या लोकलच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, लोकलच्या फूटबोर्डवर उभ्या असलेल्या एका प्रवाशाची बॅग विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकलच्या संपर्कात आल्याने अचानक तोल जाऊन अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा