मुंबई | Mumbai
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून ठाकरे-राणे वादात भर पडली आहे. ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच ठाकरे गटाच्या आमदाराने भाजप आणि राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे…
दोन ते तीन महिन्यांत नारायण राणे यांचे मंत्रीपद जाणार असल्याचे भाकीत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी वर्तवले आहे. हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे, असे देखील वैभव नाईक म्हणाले आहेत. नारायण राणे यांचे शिवसेनेवर टीका करण्याचे काम होते. ते काम आता संपलेले आहे.
“हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, विरोधकांना…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप
त्यामुळे त्यांचे मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे. असा दावा त्यांनी केला आहे. नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभे करायचे आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
पालघर समुद्र किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट आढळली; बोटीत पाकिस्तानी नागरिक
शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर बोलताना वैभव नाईक म्हणाले की, जे आमदार आमच्यातून शिंदे गटात गेले आहेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळालेली आहे, असा दावा नाईक यांनी केला आहे.