Friday, June 13, 2025
HomeनाशिकNashik News : आठ लाख शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी बाकी; ३० जूनपर्यंत अंतिम मुदत

Nashik News : आठ लाख शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी बाकी; ३० जूनपर्यंत अंतिम मुदत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शासनाकडून शिधापत्रिकेवर (Ration Card Holder) धान्य मिळविण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी (EKYC) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. शासनाने ३० एप्रिलपर्यंत ई-के वायसी करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही राज्यातील अने क शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने अखेर शासनाकडून ई-केवायसीसाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, ज्या शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे, त्यांनी ३० जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात (Nashik District) एकूण ३८ लाख, ७३ हजार ३०५ शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे पुरवठा विभागासमोर लक्ष्य होते. त्यांपैकी ३० लाख, ४२ हजार, १०१ शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आठ लाख ३१ हजार २०४ शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात एकूण ७८ टक्के शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

शिधापत्रिकांनी मेरा-केवायसी ॲप वापरावे

ई-केवायसी करण्यासाठी धान्य दुकानात गर्दी होत असल्याने शासनाने मेरा-केवायसी अॅप विकसित केले आहे. या ॲपवर ओटीपीद्वारे इतर माहिती भरणे अनिवार्य आहे सर्व माहिती भरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

नवीन शिधापत्रिकाधारकांची वाढ

गेल्या ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी प्रक्रियेसाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदतीनंतरही अनेकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी होती. नवीन शिधापत्रिकाधारकांची वाढ झाल्याने त्यांचीदेखील ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया मुदत आहे. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे, त्या शिधापत्रिकाधारकांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

– कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, अधिकारी चरे!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - सल्लागार संपादक पावसाळा आला की महापालिकेला झाडांविषयी एकदम उमाळा यायला लागतो. केव्हा एकदा वृक्षारोपणाचे टेंडर काढू अन् हे पवित्र कार्य...