Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअर्णब गोस्वामींविरोधात काँग्रेस आक्रमक

अर्णब गोस्वामींविरोधात काँग्रेस आक्रमक

संगमनेर (प्रतिनिधी) –

रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक देशविरोधी गंभीर

- Advertisement -

बाबी उघड झाल्या आहेत. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ला व त्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवरील भारताने केलेला हवाई हल्ला याप्रकरणी लष्करी गोपनीयतेचा भंग झाला आहे. हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी 22 जानेवरी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना ना. थोरात म्हणाले की, गोस्वामींना देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती कोणी दिली? त्याने ती माहिती आणखी किती लोकांना दिली? केंद्र सरकारमधील कोण महत्त्वाच्या व्यक्ती अर्नब गोस्वामीला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवत आहेत? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. गोस्वामी आणि त्याच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. दूरदर्शनने माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येत आहे. याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला मोठा पाठिंबा आहे.

पुलवामातील हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे, ‘तो’ निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का? याचे उत्तरही केंद्र सरकारने दिले पाहिजे. अर्नब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणात एकटा अर्नब गोस्वामीच दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथेचा भंग करून गोस्वामीचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचे तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकऱणात गोस्वामीला मदत करणार्‍या उच्चपदस्थांवरदेखील तात्काळ कारवाई केली पाहिजे, अशी मागणी ना.थोरात यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या