लोणी |वार्ताहर| Loni
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) यशस्वी करुन संरक्षण सिध्दता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. दहशतवादाच्या (Terrorism) विरोधातील कठोर कारवाई महत्वपूर्ण असून पहलगाम येथील हल्ल्याला भारतीय सैन्य दलाने (Indian Army Force) दिलेले चोख उत्तर कौतुकास्पद आहे. सैन्यदलाची कामगिरी देशवासियांचा अभिमान वाढविणारी असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केली.
पहलगाम (Pahalgam) येथे 26 भारतीय पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले होते. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी अतिशय संयमाने दहशतवाद्यांच्या या कृत्याला चोख उत्तर देवून आतंकवाद कधीही सहन करणार नाही असा इशाराच या अभिमानास्पद कामगिरीतून दिला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करुन भारतीय सैन्य दलाने आपली संरक्षण सिध्दता दाखवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सैन्यदलाचे त्यांनी अभिनंदन केले. केंद्र सरकारने पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचे गांभिर्य लक्षात घेवून देशवासियांच्या मनामध्ये असलेली भावना कृतीत उतरविली असल्याचे त्यांनी सांगितले.