Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar: आजचा दिवस साजरा करायचा नाही, राज्यभरात काळी दिवाळी साजरी करणार-...

Sharad Pawar: आजचा दिवस साजरा करायचा नाही, राज्यभरात काळी दिवाळी साजरी करणार- शरद पवार

बारामती | Baramati
मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला आज राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी केले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर झाला. काही ठिकाणी महापूर होता. यात शेती उद्धवस्त झाली. शेती नुसती उद्धवस्त झाली नाही, तर पीक ज्या जमिनीत यायचे ती जमीनच खरडून गेली. त्यामुळे सर्व शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्या दृष्टीने शेतीची जमीन हे त्याचे सर्वस्व आहे. कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार, म्हणून त्याच्या या दु:खात सहभागी होण्याचा आमच्या संघटनेने निर्णय घेतला” असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?
मला असे वाटते की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मला यामध्ये राजकारण आणायचे नाही. पण पूरग्रस्त भागातील लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आम्ही तशी तयारी राज्य सरकारकडे दाखवली. पण शेतकरी आणि पूरग्रस्तांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची तयारी आतापर्यंत तरी दिसून आलेली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. ते शुक्रवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

आजचा दिवस साजरा करायचा नाही
आजचा जो दिवस आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे आजचा दिवस साजरा करायचा नाही. त्याचे महत्त्वाचे कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी होती. काही ठिकाणी पूर काही ठिकाणी महापूर होता. याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त झाली आहे. तिथली जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. त्याच्यादृष्टीने शेतीची जमीन हे त्याचे सर्वस्व आहे. त्याचे सर्वस्व वाहून गेले आहे. कोणत्या मनस्थितीत तो दिवाळी साजरी करणार? म्हणून त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभाग घ्यायचा निर्णय घेतला. संकट येतात पण अशावेळी ज्यांच्या हातात राज्याची देशाची सत्ता आहे त्यांची जबाबदारी असते लोकांना संकटातून बाहेर काढणे हातभार लावायचा.

YouTube video player

नुकसान बघता या तोकड्या रकमेचा उपयोग नाही
आजच्या राज्य सरकारने काही तोकडी रक्कम काही लोकांना जाहीर केली. पण नुकसानीच स्वरूप बघितले तर या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला पुन्हा उभा करण्यासाठी होईल असे वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त नाराज आहे. मी एवढे सांगू इच्छितो की, हे जे काही घडतेय ते दुःखद आहे, त्याबाबत मला अधिक भाष्य करायचे नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

पुरदंरमध्ये शेतकऱ्यांनी त्यांना मोबदला जाहीर झाला नाही म्हणून नाराजी व्यक्त केली, त्या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिले. “मोबदला हा विषय नाही. त्यांनी जो विषय मांडला. त्याचे म्हणणे होते की जागाच बदला. हा निर्णय मी घेऊ शकत नाही. केंद्र सरकारचा हा प्रश्न आहे. जर विमानतळ कुठे करायचा हा निर्णय केंद्र सरकार घेईल. जिथे विमानतळ होईल, त्या शेतकऱ्याची शेती ताब्यात घेतली जाईल. त्यांच पुनर्वसन, नुकसानभरपाई कशी द्यायची या संबंधी शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. त्यामुळे विरोध सुद्धा आहे”.

दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईल
चर्चेत मी एवढंच सांगितलं कोणीही गैर कायद्याने शेतकऱ्यांची जमीन काढू शकत नाही. त्यांना योग्य ती नुकसान भरपाई आणि पर्यायी जमीन द्याव्यात ही त्यांची मागणी होती. मी मुख्यमंत्री पालकमंत्री यांना विनंती करणार आहे की, तुम्ही या कामाच्या संदर्भात लोकांचे उपस्थितीत यातून काहीतरी मार्ग काढा. दिवाळी संपल्यावर मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेईल ते सांगतील तेव्हा या विषयावर बोलू, असे शरद पवार यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...