Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 12332

183 शिक्षकांच्या हरकतींवरील सुनावणीनंतर निर्णय टाळला

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जिल्हा परिषद : तीन महिन्यांपासून शिक्षण विभागाने फाईल दडवली

अहमदनगर (प्रतिनिधी) – जून महिन्यात झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रकियेत त्रुटी राहिल्याने त्यातील काही शिक्षकांनी न्यायालयात, विभागीय आयुक्तांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली होती. मात्र त्यावर न्यायालयाने याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर सुनावणी घेऊन हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांच्या हरकतींवर निर्णय घेण्यास टाळले आहे. यामुळे या शिक्षकांच्याबाबत निर्णय न घेण्याबाबत शिक्षण विभागाचा हेतू काय? असा सवाल निर्माण झाला आहे.

जून महिन्यात शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. यावेळी ऑनलाईन भरलेल्या अर्जात संबंधित शिक्षकाला एकही शाळा मिळाली नाही. काही शाळांवर एकाच वेळी दोघा शिक्षकांच्या बदल्या झाल्या. तर काही शिक्षक विनाकारण तांत्रिक चुकीमुळे रॅन्डम राऊंडमध्ये फेकले गेले. अशा सर्व शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या बदली प्रक्रिये विरोधात न्यायालयात आणि विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. त्यावर न्यायालयाने आणि सरकार पातळीवरून शिक्षकांच्या हरकतीवर सुनावणी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुनावणी घेऊन हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार तत्काली प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी आणि शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी सलग तीन ते चार दिवस 183 शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर सुनावणी घेत त्यांच्या हरकती नोंदविल्या होत्या. ही प्रक्रिया सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडली. मात्र तीन महिन्यांनंतर प्राथमिक शिक्षण विभागाला यावेळी घेतलेल्या सुनावणी आणि शिक्षकांच्या हरकतींवर सुनावणी घेता आलेली नाही. विनाकरण या प्रकरणी फाईल शिक्षण विभागात दाबून ठेवण्यात आलेली आहे.

या 183 शिक्षकांच्या हरकतीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयाचे इतिवृत्त तयार करून संबंधित शिक्षकांना त्यांच्या संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत कळविणे गरजेचे होते. मात्र या प्रकरणात तीन महिन्यांनंतर देखील या 183 शिक्षकांबद्दल काय निर्णय घेतला हे संबंधितांना सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे त्यावेळी झालेल्या सुनावणीचे इतिवृत्त अद्याप तयार नाही. यामुळे या शिक्षकांच्याबाबतीत गुढ वाढले असून तीन महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्या शिक्षकांबाबत काय निर्णय घेतला होता, हे ते देखील विसरले असणार आहेत. यामुळे हे प्रकरणच आता संशयाच्या भोवर्‍यात आले आहे.

जिल्हा परिषद सुनावणीनंतर विषयावर निर्धारीत वेळेत निकाल न देणे हे प्रशासकीय दृष्ट्या चुकीचे आहे. या विनाकारण वेळखावू वृत्तीमुळे आक्षेप घेण्यास वाव निर्माण होतो.
– जगन्नाथ भोर, तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी.

झोतवाडे येथील तरुण शेतकर्‍याची विषप्राशनाने आत्महत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिंदखेडा  – 

झोतवाडे ता. शिंदखेडा येथे तरूण शेतकर्‍याने विषारी औषध घेवून आत्महत्या केली. नितीन (जिजाबराव) आनंदा सदाराव  (वय 35) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

मागील वर्षी कोरडा दुष्काळ पडला त्यात सरकारने तुटपुंजी मदत केली. त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज कसे पेड करायचे व परिवाराचे उदरनिर्वाह कसे करायचे यामुळे त्याला नैराश्य आले होते.

या वर्षी देखील अतीवृष्टीमुळे शेतातील कापुससहीत सर्व पिकांचे झालेले नुकसान पाहुन या वर्षीही सहा एकर जमीन मध्ये दोन भावांच्या परीवाराचा उदरनिर्वाह कसा करावा, बँकेचे घेतलेले तीन लाखाचे कर्ज व खाजगी कर्ज कसे फेडावे या विवेचंनात असतांना  मुलांचे शिक्षण कसे करणार याला कंटाळून त्याने फवारणीचे औषध घेवून आत्महत्या केली.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व माजी पं.स.सदस्य शानाभाऊ सोनवणे यांना शेतकर्‍याच्या आत्महत्या  केल्याचे समजताच त्यांनी झोतवाडे गावाकडे धाव घेतली व नितिन (जिजाबराव) आनंदा सदाराव याला उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे दाखल केले.

तेथुन नितिन सदाराव याला जिल्हा रुग्णालयात येथे हलविण्यात आले व धुळे जिल्हा रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.शानाभाऊ सोनवणे यांनी मयताच्या परिवाराचे सांत्वन केले.

नितिन सदाराव याच्या पश्चात दोन मुली, मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजाई,बहिण असा परीवार आहे.

धुळ्यात पुर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धुळे  – 

शहरातील साक्री रोड परिसरात पुर्ववैमनस्यातून आज सायंकाळी दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात तलवारीसह लाठ्या काठ्यांचा सर्रासपणे वापर करण्यात आला. त्यात नगरसेवक बन्सी जाधव यांच्यासह दोन्ही गटातील पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेमुळे साक्री रोड परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरातील साक्रीरोडील भिम नगरजवळ माजी नगरसेवक  पुत्र आणि विद्यमान नगरसेवक बन्सी जाधव यांच्या गटात सायंकाळी वाद झाला. त्यानंतर वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

काहींनी दुकानाच्या काच  फोडून नुकसान केले. हाणामारीत तलवारीसह लाठ्या काठ्यांचा सर्रासपणे वापर करण्यात आला. त्यात नगरसेवक बन्सी जाधव यांच्यासह किरण धिवरे, तुषार धिवरे, प्रविण धिवरे, प्रविण शिरसाट, आकाश अहिरे  हे जखमी झाले.

तसेच माजी नगरसवेकांच्या गटातील देखील काही जण जखमी झाल्याचे कळते. जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेदरम्यान साक्री रोड परिसरात नागरिकांची एकच पळापळ झाली. तसेच व्यावसायीकांची देखील धांदल उडाली. अनेक व्यावसायींकांनी दुकाने बंद केली. त्यामुळे साक्री रोडवरील वाहतूक देखील मंदावली होती. तर नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेनंतर साक्री रोडपरिसरात शुकशुकटा दिसून आला. तसेच नागरिकांसह व्यापार्‍यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस दाखल, बंदोबस्त तैनात

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाहणी करून संशयीतांचा शोध सुरू केला. घटनास्थळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

महिलांची निदर्शने

हाणामारीत माजी नगसेवक गटातील काही जण जखमी झाले आहेत. त्यांना मारहाण करणार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी माजी नगरसेवक गटाकडून महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत निदर्शने केली.