Tuesday, April 28, 2026
Home Blog Page 13326

साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे राजीनामे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात नंबर वन असलेल्या साईबाबा संस्थानच्या कर्मचार्‍यांची साईबाबा संस्थान एम्प्लॉइज को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपल्या पदाचे राजीनामे सचिव नबाजी डांगे याच्याकडे सुपूर्द केले आहे. नूतन अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान साईबाबा संस्थान एम्लॉईज सोसायटीच्या अध्यक्षपदी तुषार शेळके तसेच उपाध्यक्षपदी दीपक धुमसे यांची मागील वर्षी निवड करण्यात आली होती. मात्र त्यांचा एक वर्षाचा कालावधी 22 ऑक्टोबर 2019 रोजी संपला आहे. विद्यमान संचालक मंडळाची बैठक येत्या 10 डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विषय क्रमांक 7 व 8 मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे राजीनामे स्वीकारण्याबाबत सभेपुढील विषय असल्याने नूतन अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते तसेच पुढील घडामोडी काय घडतात याकडे सर्व कर्मचार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान 75 कोटींच्या आसपास ठेवी असलेल्या व वर्षाला साधारणपणे चार कोटी रुपये नफा मिळवणारी जिल्ह्यातील अग्रगण्य ठरणारी एकमेव सोसायटी म्हणून नावारूपास आली आहे. नवीन अध्यक्षपदासाठी विद्यमान संचालक यादवराव कोते यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत शेळके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की माझ्या एक वर्षाच्या कार्यकाळात संस्थानचे अधिकारी व सहकारी संस्थेचे सहा. निबंधक जितेंद्र शेळके यांनी सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

माझा कार्यकाळ संपला असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असून वर्षभरातील कामकाजाबाबत मी अत्यंत समाधानी आहे. मला आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेली जबाबदारी निर्विवादपणे पार पाडली आहे. त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो.
– तुषार शेळके, अध्यक्ष, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी.

राहाता तालुक्याचे भाग्यविधाते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना सर्वसामान्य कर्मचार्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या सूचना व निर्णय मला मान्य राहतील.
-यादवराव कोते संचालक, साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी.

गुलाबवाडी होणार ‘गुलाबी गाव’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

चंद्रकांत विचवे,रावेर ।

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गावाला गुलाबी गाव अशी ओळख जितेंद्र गवळी या शिक्षकाने करून दिली. आता रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गुलाबवाडी गावाला ‘पिंक व्हिलेज’ करण्याचा विडा उचलला आहे.

500 लोकसंख्या आणि 170 घरे असलेल्या या गावात 25 डिसेंबरपर्यंत संपूर्ण घरांना गुलाबी रंग लावून महिला सक्षमीकरण गजर केला जाणार आहे.

रावेर तालुक्यातील पाल येथील जितेंद्र गवळी नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात कार्यरत असताना भिंतघर गावाला ‘पिंक व्हिलेज’ करण्यासाठी पुढाकार घेतला. आता त्यांनी रावेर तालुक्यातील गुलाबवाडी गावाला ‘पिंक व्हिलेज’ गाव करण्यासाठी संकल्प केला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून या गावात हे शिक्षक शाळा सुटल्यावर जाऊन गावकर्‍यांच्या गाठी भेटी घेतात. सर्वच गावकर्‍यांकडून त्यांच्या या संकल्पनेला होकर मिळत आहे.

प्रत्येक कुटुंबांकडून प्रत्येकी 500 रुपये वर्गणी जमा करून गावाला रंगरंगोटी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ओला सुका कचरा संकलित करणे, रस्त्यावर सडा-रांगोळी घालून रस्ते सुशोभित करणे, गुरांच्या गोठ्यात स्वच्छता राखणे, मुलांचे गणवेश, त्यांना नीट नेटके ठेवण्यासाठी पालकांना मार्गदर्शन, भिंतीवर प्रबोधन करतील अशा सुरेख म्हणी, नागरिकांना वृक्ष तोडीपासून परावृत्त करणे, प्लास्टिक बंदी, गलुल बंदी, हुंडाबंदी यासारख्या सामाजिक प्रथांना रोखण्यासाठी गावकर्‍यांना संघटीत केले जात आहे. यासाठी गावकर्‍यांची आदर्श ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे गावात राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमावर ऊहापोह केला जातो.

चार महिन्यांपूर्वी जितेंद्र गवळी आले तेव्हा नागरिकांना अनुत्साह होता. यापूर्वी गावातील जवळपास 10 जण किडनीच्या आजाराने दगावले असल्याने नागरिक हताश झाले होते.

त्यांना या संकल्पना आणि उपक्रमात काही रस नव्हता. मात्र गवळी यांनी हार न मानता गावकर्‍यांच्या भावनांना साद घालून सर्वांची मते परिवर्तीत केले. नागरिकांना गावात पडणार्‍या पावसांची नोंद करण्यासाठी पर्जन्यमापक लावण्यास उद्युक्त केले.

आता गावाला रंग-रंगोटी सुरू आहे. 25 डिसेंबर रोजी ब्रह्मलीन प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्यजी महाराज यांच्या पुण्यतिथीपासून गावाला ‘पिंक व्हिलेज’ म्हणून ओळखले जाणार असल्याचा विश्वास जितेंद्र गवळी यांना आहे.

दिव्यांग कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीच्या प्रश्नाबाबत लवकरच निर्णय घेणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शिवराज पाटील : जिल्हा परिषदेत शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचार्‍यांचा दिव्यांगभूषण पुरस्काराने सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – दिव्यांग व्यक्ती ही समाजाचाच एक भाग असून त्यांच्याप्रती संवेदनशील असणे हे समाजाचे कर्तव्य आहे. शासकीय सेवेत कार्यरत असलेले दिव्यांग कर्मचारीही आपल्या उत्कृष्ट कामाने ठसा उमटवत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करताना विशेष आनंद मिळतो. हे दिव्यांग कर्मचारी सर्वांसाठीच रोल मॉडेल आहेत. त्यांनी हे काम अशाच पध्दतीने कायम ठेवून दिशादर्शक बनावे. अपंगांच्या पदोन्नतीबाबतची प्रकरणे तातडीने निकाली काढून निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिली.

राज्य शासन मान्यता प्राप्त अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जगातिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त संघटनेच्यावतीने दिव्यांग अधिकारी, कर्मचारी यांना दिव्यांभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, मुख्य लेखा अधिकारी श्रीकांत अनारसे, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, बापूसाहेब तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, संघटनेचे अध्यक्ष साहेबराव अनाप, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय जपे, कार्याध्यक्ष राजू आव्हाड, सचिव पोपट धामणे, संतोष सरवदे, रमेश शिंदे, उद्धव थोरात, राजेंद्र दुबे, किरण माने, राजेंद्र औटी, गजानन मुंडलिक, अमोल चन्ने आदी उपस्थित होते.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर म्हणाले, आजचे सन्मानार्थी शरीराने दिव्यांग असले तरी कर्तृत्त्वाने शारीरिक सृदृढ व्यक्तींपेक्षा कांकणभर सरसच आहेत. त्यांच्या कर्तृत्त्वाची उंची खूपच मोठी आहे. प्रत्येक दिव्यांगामध्ये एक संवेदनशील मन असते. त्यामुळे शासकीय सेवेत ते मनापासून कर्तव्य बजावताना पाहायला मिळतात. प्रास्ताविकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप म्हणाले, पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष आहे. दिव्यांग बांधव शासकीय सेवेत अतिशय निष्ठेने काम करतात. ग्रामीण भागात वाड्यावस्त्यावर जाताना होणारा त्रास विसरुन आपले विहित कर्तव्य बजावत असतात. आपल्या कामातून सर्वसामान्यांना मिळणारा आनंद शारीरीक वेदना विसरण्याची ताकद देतो. यावर्षी शासकीय सेवेतील 24 दिव्यांग कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केशव भांगरे आणि राजेंद्र साबळे (अकोले), रुक्मिणी बोरुडे (कर्जत), मदिना शेख (कोपरगाव), सुमित पेटकर (जामखेड), निलेश कांबळे (जामखेड), साहेबराव मले (नेवासा), मनीषा ताजवे (पारनेर), मिठू शिंदे (पाथर्डी), उषा सिनारे (राहाता), बाबासाहेब बोरसे (राहुरी), तुकाराम भगत (शेवगाव), नारायण झेंडे (श्रीगोंदा), सुनिता सोनवणे (श्रीगोंदा), नासिर सय्यद (श्रीरामपूर), सचिन रणाते (संगमनेर), बन्सी ठोंबरे (नगर), सुनंदा भडांगे (मुख्यालय) व वनमाला दिनकर (नगर), मारुती साळवे (श्रीगोंदा) या गुणवंत कर्मचार्‍यांना दिव्यांग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्यांग कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

विकासकामे होत नसल्याने भाजपा नगरसेवकांमध्ये अस्वस्थता

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव  – 

सोशल मीडियाच्या चर्चेवरुन भाजपा नगरसेवकात, तसेच सेना सोडून गेलेल्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. विकासकामे होत नसल्याने आणि राज्यस्तरावर भाजपाचे सरकार बदलल्याने अनेक भाजपा नगरसेवक अस्वस्थ आहेत.

त्यामुळे सेनेतून भाजपात गेलेले अनेक पुन्हा सेनेत परतीच्या मार्गावर आहेत. सेना मात्र फोडाफोडीचे राजकारण करीत नाही, विकासकामासाठी जर कुणी आम्हाला येवून मिळत असेल, अन सत्तेचे गणित जुळत असेल तर वरिष्ठ पातळीवरुन जो निर्णय होईल तो आम्ही घेवू, शेवटी विकासकामे ही थांबून राहू नये अशी माहिती पत्रकार परिषदेत मनपा शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली. यावेळी त्यांचे सोबत शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक बंटी जोशी, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

स्थानिक नेतृत्व सपशेल अपयशी

केंद्र, राज्य तसेच जळगाव मनपात सत्ता असतांनाही स्थानिक नेतृत्व निधी सपशेल फेल झालेले आहे.  1100 कोटीचा निधी आणल्याचा आव आणणार्‍या स्थानिक नेतृत्वाने एक दमडीही आणली नाही, आमची सत्ता असतांनाचे 100 कोटींपैकी 7 कोटी अद्यापही पडून आहेत. या 7 कोटीच्या निधीची वारंवार मुदतवाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

नगरसेवकांचा नेतृत्वावर विश्वास नाही

अनेक वार्डात विकासकामे नाहीत, अनेक कामांचे कार्यादेश निघालेले असतांनाही कामे सुरू नाहीत, याचे कारण मुख्य कारण म्हणजे मक्तेदारांसह नगरसेवकांचाही विश्वास स्थानिक नेतृत्वावर राहिला नाही, सरकार बदलल्याने निधीची चिंता आतापासूनच नेतृत्वाला सतावू लागली आहे. त्यामुळे आता यापुढे निधी मिळणार की नाही, आपल्या वार्डात विकासकामे होतील की नाही यावरुन भाजपा नगरसेवकही अस्वस्थ आहेत.

आश्वासनाची केवळ खैरात

14 महिने सत्तेत असल्यानंतरही अनेक विकासकामे झाली नाहीत. मोठे उद्योग शहरात आणण्याच्या वावड्या उठविल्या जात होत्या. मात्र एक तरी उद्योग आणला आहे का ? असा प्रती सवालही त्यांनी यावेळी केला.  राज्यातील सत्ता बदलाने त्याचे परिणाम स्थानिक पातळीवरही होवू पाहत आहेत. सत्ता बदलाने आता यापुढे विकासकामांना निधी मिळणार की नाही म्हणूनही नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे.

श्रीरामपूरकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांत संताप

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहराला गेल्या दीड महिन्यापासून बोरींगची चव असणारा पाणीपुरवठा होत असताना आता ज्या कालव्यामार्फत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये पाणी सोडले जाते त्या कालव्यामध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ खेळला जात आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कालव्यात साचलेली घाण व त्यातून निर्माण झालेले जीवाणू आणि विषाणू आणि त्यांना सोबत घेऊन होणारा पाण्याचा प्रवास यामुळे शहरातील जनतेचे आरोग्य बिघडले आहे. या दूषित पाण्यामुळे शहरांमध्ये विविध प्रकारचे रोग वाढले आहेत. नगरपालिकेने याबाबत गंभीरपणे दखल घेऊन कालव्यात जमा होणार्‍या या कचरा आणि घाणीचा बंदोबस्त करून याला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रवरा कालव्याच्या नॉर्दन ब्रँच येथून डावीकडे जाणार्‍या कालव्यामार्फत शहरातील साठवण तलावामध्ये पाणी घेतले जाते.

दहाव्याच्या ओट्यापासून गोंधवणी रोडवरील पुलापर्यंतच्या कालव्यामध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूकडील राहणारे नागरिक घरातील कचरा व इतर प्रकारची सर्व घाण थेट कालव्यातच टाकतात. सध्या कालव्याला पाणी नसले तरी पूर्वीच्या जमा असलेल्या पाण्यामध्ये शेवाळ साचले आहे. कचर्‍यामुळे तेथे जंतू व जिवाणू निर्माण झाले आहेत. मृत जनावरे, कुत्रे, कपडे, प्लॅस्टिक व इतर सर्व प्रकारचा कचरा कालव्याशेजारचे राहणारे लोक थेट कालव्यात टाकतात. तो कचरा साचून त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाटाला पाणी येण्यापूर्वी या कालव्याची साफसफाई जरी केली जात असली तरी पाणी गेल्यानंतर जो कचरा जमा होतो तो साचल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन ती पाण्यामध्ये मिसळली जाते. यामुळे पाणी दूषित होते. सध्या शहराला केला जाणारा पाणीपुरवठा हा सुद्धा चर्चेचा विषय झालेला आहे. साठवण तलावामध्ये होणारा पाणीपुरवठा जास्तीत जास्त शुद्ध व्हावा यासाठी नॉर्दन ब्रँचपासून गोंधवणीच्या पुलापर्यंत कालव्याच्याकडेने भिंत उभारावी किंवा नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावापर्यंत वेगळी मोठी पाईपलाईन टाकून बंद नलिकेद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जाणारा हा जीवघेणा खेळ थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पिण्याच्या पाण्याची चव पूर्ववत होण्यासाठी कार्यवाही व्हावी !
दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून नळाला येणार्‍या पाण्याची चव बदलली आहे. प्रत्येक भागातून याबाबत तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेत याबाबत खुलासा करताना पाणी दूषित नसल्याचे जाहीर केलेले असले तरी पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या क्लोरिन पावडरमुळे ही चव बदलल्याची चर्चा शहरात आहे. त्यासाठी सध्या वापरात असलेली क्लोरिन पावडर बदलण्याची व पाण्याची चव पूर्ववत होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करण्याची मागणी जनतेने केली आहे.

शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना चूक झाली म्हणून कोपरगावात महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोपरगाव (प्रतिनिधी) – शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे शहरातील वाणी सोसायटीत राहणार्‍या पूजा संजय अरगडे या 17 वर्षीय तरुणीने आपली शिष्यवृत्ती बुडल्याच्या कारणावरून घरातील छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पीडित मुलीचे वडील नोकरीस असून ते कामावर गेले असताना घरी ही मुलगी व आई या दोघीच होत्या. आईने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलीच्या वडिलांना भ्रमणध्वनीवरून आपण बाजारात चाललो असून तुमचे कार्यालय बंद झाल्यावर तुम्ही मला बाजारात घेण्यासाठी या, असे सांगितले होते. त्याप्रमाणे ते दोघे आपली कामे आटोपून घरी आले. घराचा दरवाजा त्यांना बंद आढळला. त्यांनी मुलीला हाक मारून प्रतिसादाची वाट पहिली मात्र आतून काहीही प्रतिसाद आला नाही.

त्यामुळे त्यांनी तिच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पहिला. त्यालाही आतून प्रतिसाद आला नाही. दरम्यान या वसाहतीतील नागरिक जमा झाले. त्यांनी घराचे निरीक्षण केले असता एक दरवाजा उघडता येईल असा असल्याने त्यांनी तो उघडून आत डोकावून पहिले असता पूजा हिने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे लक्षात आले. आतील घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांच्या समक्ष लोखंडी दरवाजाचे गज कापून पूजाला खाली उतरून उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पो. हे. कॉ आर.पी. पुंड हे करीत आहेत.

विटंबना झालेला मृतदेह नेमका कोणाचा?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

महापालिकेसह सर्वच यंत्रणा संभ्रमात ः नियमही कठोर करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – अमरधाममध्ये विटंबना झालेला मृतदेह नेमका कोणाचा, याबाबत अद्यापही महापालिका अंधारात आहे. अंत्यविधी झालेल्याची नोंद नसल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे संबंधिताचे नातेवाईकही याबाबत शांत असल्याने गोंधळ वाढत आहे.

अमरधाममध्ये सोमवारी अंत्यविधी झाल्यानंतर एकाचा अर्धवट जळालेला मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढल्याचे समोर आले होते. त्यानंतर नवग्रह मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विधीपूर्वक अंत्यविधी केला होता. मात्र या प्रकारामुळे शहरात संताप व्यक्त होत होता. महापालिकेची यंत्रणा अमरधाम सक्षम नसल्यानेच हा प्रकार ओढवल्याचा आरोप होत होता. महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही या प्रकारानंतर लगेच बैठक घेऊन अमरधाम येथील सुविधांचा आढावा घेत वेगवेगळ्या सूचना केल्या. असे असले तरी अर्धवट जळालेला मृतदेह कोणाचा, त्यांचे नातेवाईक कोण, अमरधाममधील कर्मचार्‍यांना याची कोणतीच माहिती कशी नाही, मृतदेह अर्धवट अवस्थेत बाहेर काढणारे कुत्रेच होते की अन्य काही कारणामुळे तो बाहेर निघाला असे अनेक प्रश्‍न विचारले जात आहेत.

मात्र हा प्रकार घडल्यानंतर आता गार्डन, आरोग्य आणि बांधकाम विभागाचे प्रत्येकी तीन कर्मचारी अतिरिक्त तेथे नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच अमरधामच्या संरक्षक भिंतीच्या दुरूस्तीचेही आदेश दिले असून, त्यानुसार इस्टिमेट तयार करण्यात आले आहे. अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या प्रत्येकाची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्र सक्तीचे करणार?
यापुढे अंत्यविधीसाठी पार्थिव तेथे आल्यानंतर संबंधित नातेवाईकांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्याचा विचार महापालिकेचा आहे. प्रमाणपत्र आणि नगरसेवकाचे पत्र यापैकी एक किंवा दोन्हीही बंधनकारक करावे का, असा विचार सुरू आहे. तसेच तेथील कामकाज खासगी संस्थेकडे सोपविण्याचाही विचार आहे. नोंदीसह सर्व जबाबदारी त्या संस्थेवर सोपविण्याचाही एक विचार आहे.

सोयाबीन पळविणार्‍या दोघांना अटक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – मार्केटयार्ड येथून धुळे येथे नेण्यासाठी ट्रकमध्ये भरलेला नऊ लाख 51 हजारांचा सोयाबीन ट्रक चालकाने मालकाच्या साथीने गायब केल्याचे समोर आले आहे. यामध्ये नगरच्या व्यापाराची मोठी फसवणूक करणार्‍या परराज्यातील दोघांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. काशिद रशिद शेख व रियाज रज्जाक लोहार (रा. सैंधवा, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्यापारी भगवानदास गुलचंद गांधी यांनी मार्केटयार्ड येथून 230 क्विंटल सोयाबीन ट्रक (क्र. एमपी- 09 एचएच- 9919) मध्ये भरून दिले होते. ट्रक चालक मुकेश कुमार (रा. सैंधवा, मध्यप्रदेश) याला सोयाबीन धुळे येथील अ‍ॅक्ट्रक्शन कंपनीत पोहोच करण्यास सांगितले होते. त्याने ते गायब केले. याप्रकरणी गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कोतवाली पोलिसांनी ट्रक चालकाचा मध्यप्रदेश येथे शोध घेतला, पण तो मिळून आला नाही.

ट्रकचा मालक बबलू ऊर्फ काशिद रशिद शेख असल्याचे समजताच त्याला सैंधवा (जि. बडवणी, मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले. त्याने ट्रक चालक मुकेश कुमार याच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिली. मध्यस्थी करून सोयाबीन विकणारा रियाज रज्जाक लाहोर यालाही कोतवाली पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून सहा लाखांचे 15 टन सोयबीन व 12 लाखांचा ट्रक असा 18 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास वाघ, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस नाईक अण्णा बर्डे, राहुल शेळके, राजू शेख यांनी केली.

थकित कर वसुलीसाठी आयुक्त द्विवेदी आक्रमक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मोठे थकबाकीदार झळकणार फ्लेक्सवर, नळजोडही तोडण्यात येणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेताच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कर वसुलीवर लक्ष केंद्रीत केले असून, थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर झळकविण्यापासून, मालमत्ता जप्त करणे, नळकनेक्शन तोडणे आदी कारवाई करण्याचे आदेश दिले.

द्विवेदी यांनी मंगळवारी महापालिकेत बैठक घेतली. यामध्ये थकित कराबाबत त्यांनी आढावा घेतला. सुमारे 282 कोटींची थकित बाकी कागदोपत्री दिसत असली तरी न्यायालयीन वादात अडकलेली थकित रक्कमही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे न्यायालयीन अडचण येणार नाही, अशी थकित रक्कम तातडीने वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले. आतापर्यंत 36 कोटींची वसुली झालेली असून, पुढील मार्चअखेरपर्यंत 38 कोटींचे उद्दिष्ट द्विवेदी यांनी प्रभाग समिती कार्यालयांना दिले.

वसुलीची मोहीम कठोरपणे राबविताना त्यासाठी लोकांना माहिती मिळावी म्हणून ध्वनिक्षेपकावरून अनाउन्समेंट करण्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी काही रीक्षा आणि सध्या महापालिकेच्या दारोदार फिरत असलेल्या घंटागाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या थकबाकीदारांची यादी शहरात चौकाचौकांत फ्लेक्सद्वारे झळकवतानाच ही यादी चित्रपटगृहामध्येही झळकविण्याचे सांगण्यात आले आहे.

शहरातील चार प्रभाग समित्यांना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये सावेडी प्रभाग समितीला बारा कोटी, बुरूडगाव प्रभाग समितीला दहा कोटी, शहर व झेंडीगेट प्रभाग समितीला प्रत्येकी आठ कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले आहे. मार्चअखेरपर्यंत इतर कामे करतानाच वसुलीवर प्रभाग अधिकार्‍यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्याचेही सांगण्यात आले आहे.

शास्तीमाफी यावर्षी नाहीच
कर वसुलीची मोहीम तीव्र झाल्यानंतर नगरसेवकांतून लगेच शास्ती माफीचा आग्रह धरला जातो. शास्तीमध्ये माफी देण्याचा अधिकार आयुक्तांकडे आहे. चालू आर्थिक वर्षात ही माफी मिळालेली नाही. त्यामुळे आता ही माफी मिळावी, असा आग्रह नगरसेवकांचा असतो. त्यानुसार मागणीचे पत्रकही निघू लागले आहेत. मात्र यापूर्वी अनेकदा शास्तीमाफी देऊनही मोठ्या थकबाकीदारांनी त्याचा लाभ घेतलेला नाही. त्यामुळे प्रशासन यावर्षी शास्ती माफी देण्याच्या मानसिकतेत नाही. आगामी काळात यासाठी किती दबाव येतो, यावरच शास्तीमाफीचा निर्णय अवलंबून असेल.

राज्यात न्यायाधीशांसह इतर 1386 पदे रिक्त

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव  – 

महाराष्ट्रातील न्यायालयांमधील न्यायाधीश आणि त्यांना सहाय्य करणारे इतर 1386 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.  प्रशासकीय व नागरिकांच्या सोयीसाठी ही पदे लवकरात लवकर भरावेत, अशी मागणी  हॅपी रिसर्च अँड मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.आशीष एस.जाधव यांनी पत्रकार परिषदेत दुपारी दिली.  याबाबतचे निवेदन मुुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधिशांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

ही पत्रकार परिषद मंगळवारी दुपारी एका हॉटेलमध्ये झाली. यासंदर्भातील माहिती प्रा.डॉ.आशिष एस.जाधव यांनी माहितीच्या आधारे मिळवली आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथील न्यायालयांमध्ये न्यायाधिशांची 27 पदे रिक्त आहेत.

त्यांना कामकाजात सहाय्यभूत ठरतील, असे संदर्भ क्र.1 (बी) नुसार मुंबई हाय कोर्टात ग्रुप ए, बी, सी, डी.ची अनुक्रमे 29, 9, 119, 22 अशी एकूण 179 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत.

नागपूर खंडपीठात ग्रुप ए, बी, सी, डी. अनुक्रमे 3, 11, 87, 39 अशी एकूण 140 पदे रिक्त आहेत. औरंगाबाद खंडपीठात ग्रुप ए, बी, सी, डी. या वर्गातील अनुक्रमे 2, 3, 76, 18 अशी एकूण 99 पदे रिक्त आहेत.

तसेच महाराष्ट्रात जिल्हा न्यायालयांमधील व इतरत्र न्यायालयात वर्ग दोन ते चारचे 941 पदे रिक्त आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात न्यायाधिशांसह इतर असे एकूण 1386 पदे रिक्त असल्याचे प्रा.डॉ.जाधव यांनी सांगितले.

तसेच संदर्भ क्र.एक सी नुसार राज्यात सुमारे एक लाख 25 हजार 108 पेक्षा अधिक न्यायालयीन दावे आणि खटले न्यायालयांमध्ये न्यायप्रवीष्ठ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला अश्पाक पिंजारी, डॉ.शरीफ शेख, अ‍ॅड.हरिहर पाटील, ललित शर्मा, उमाकांत वाणी आदी उपस्थित होते.