Saturday, May 2, 2026
Home Blog Page 13349

कर्जत : ताजु येथे विद्यार्थ्यांनी भरवला बाजार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कुळधरण (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील ताजू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दफ्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळेत बाजार भरवला. मुख्याध्यापक दिपक सुपेकर तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बाजार भरवला. या उपक्रमाला ताजू ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालेभाज्या,फळभाज्या व इतर वस्तूंची खरेदी केली. या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

ताजू शाळेत प्रथमच भरवण्यात आलेल्या बाजाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.शालेय विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री व्यवहाराचे ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.बाजारात मुलांनी भाजीपाला,फळे, कडधान्य,खाद्यपदार्थ यासह विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.स्वतःच्या शेतात पिकवलेला माल विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणला होता. या उपक्रमामुळे शाळा परिसराला बाजाराचे रुप आले होते. ग्रामस्थांनी उस्फूर्त खरेदी करून विद्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद दिला.

Fadnavis elected Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

MUMBAI:

Former Chief Minister Devendra Fadnavis was on Sunday elected unopposed as the Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly. Speaker Nanabhav Patole announced the name of Mr Fadnavis to the prestigious post, amid applause and thumping of desks by the ruling Maha Vikas Aghadi members and the Opposition benches.

Chief Minister Uddhav Thackeray and other leaders like Jayant Patil, Eknath Shinde and Balasaheb Thorat congratulated Mr Fadnavis and welcomed his election to the post. The 49-year-old was elected as the first-ever BJP CM of the state in October 2014 and later sworn-in again in November 2019, along with NCP’s Ajit Pawar as Deputy CM.

However, the two-man government collapsed in barely 80 hours, paving the way for the Shiv Sena-Nationalist Congress Party-Congress’ MVA regime. Fadnavis hails from Nagpur and was elected as Nagpur Municipal Corporation Mayor for five years in 1997 – the second youngest ever in India.

मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा ! विधानसभेत फडणवीसांचा शायराना अंदाज

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,’ अशा कवितेच्या ओळी म्हणत विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्या आगमनाचे भाकीत केले आहे. विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात घोषणा केली, त्यानंतर भाजपा सदस्यांसह सर्वच सदस्यांनी बाके वाजवुन त्यांचे स्वागत केले. सत्ताधारी पक्षांनी गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या राजकीय परिस्थितीची आठवण करुन देत देवेंद्र फडणवीस यांना राजकीय चिमटे काढले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या वेळी फडणवीस यांना टोले मारायची संधी सोडली नाही…

आपण तर गेले २५-३० वर्षे एकत्र आहोत. मित्र होते ते विरोधात बसलेत, तुम्ही मित्रत्व जपले असते तर आज मी घरात बसुन विधीमंडळाचे हे प्रक्षेपण पाहीले असते पण आता विरोधी पक्ष सोबत आलेत आणि मित्र विरोधी बाकांवर बसलेत असा टोला मारत या अर्थाने खरे तर विरोधक कुणीच नाही. विरोधी पक्षनेता माझा मित्रच आहे, तेव्हा दोघांमध्ये अंतर ठेवायला नको. कोणाचे वाभाडे काढण्याची आपली परंपरा नाही,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या ठरावावेळी केले.

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे फडणवीस म्हणाले होते, पण मी पुन्हा येऊन कुठल्या जागेवर बसेन हे मात्र त्यांनी सांगितले नव्हते. ते सभागृहात पुन्हा आले आहेत, केवळ जागा बदलली आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर शेलकी टीका केली. संसदीय लोकशाहीत मुख्यमंत्री पदा इतकेच विरोधी पक्षनेतेपदही महत्वाचे असते, त्यामुळे फडणवीस आपली ही जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडतील, यात आम्हाला शंका नाही, अशा शब्दात पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

अभिनंदनाच्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की प्रेमाचे, जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध राजकारणापलिकडे असतात. ‘जनतेकडून त्यांच्या मनात ज्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत; तसेच मुख्यमंत्र्यांच्याही महाराष्ट्राच्या विकासासाठी काही योजना असतील, त्या सर्वांसाठी आम्ही त्यांना सहकार्य करू,’ मात्र जेव्हा जेव्हा सरकारचे नियमानुसार काम होणार नाही तेव्हा आसुड ओढल्याशिवाय रहाणार नाही, विरोधी पक्ष म्हणजे केवळ शत्रु नाही, तर वैचारीक विरोधक म्हणुन एकमेकाच्या विरोधात बसलो आहोत, मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं, त्यामुळे वाट पाहा…अशा शब्दांत विधानसभेतील फडणवीस यांनी त्यांच्यावरील टीकेला सभागृहात उत्तर दिले

.’मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,’ अशा कवितेच्या ओळी त्यांनी म्हटल्या. ‘लोकशाहीत अशा अनेक गोष्टी घडत असतात. ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ४० टक्के मिळालेले तिघे १२० टक्क्यांनी मेरिटमध्ये आले,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी नव्या सरकारच्या आघाडीची आकडेमोड केली.मुख्यमंत्र्यांनी कधीही आवाज दिला तरी जनतेच्या प्रश्नासाठी आपली भुमिका सकारात्मक असेल असेही त्यांनी या वेळी सांगितले..

शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक। शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून विविध ठिकाणांवरून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

संजय जामराव गढरी (रा. शिवाजीनगर, सातपूर) हे गेल्या बुधवारी (ता.27) रविवारी कारंजा येथे गेले असता, पेठे हायस्कूलसमोर पार्क केलेली त्यांची 11 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 15 सीडब्ल्यु 9648) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर आधार ठाकरे (रा. सांजोरी, ता.धुळे) यांची 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 18 एल 8245) गेल्या 23 नोव्हेंबर रोजी नेहरु गार्डनसमोरून रमाबाई आंबेडकर वसतिगृहाच्या गेटसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन अनिल थेटे (रा. बायजाबाई छावणी, रामवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची 20 हजार रुपये किमतीची अ‍ॅॅक्टिवा दुचाकी (एमएच 15 इडी 2939) गेल्या 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्री राहत्या घरापासून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mudray Yuva felicitates social activists with Maitri Sanman

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NEW NASHIK:

Celebrating its third fondation day, social organisation Mudray Yuva Foundation honoured social workers, institutions for their exemplary contribution in the social field. In a state-level award presentation ceremony held here, chief guest and famous actress Ashu Surpur, international athlet Monika Athare, Mrs India International Shilpi Avasthi, model Sandesha Patil, senior PI Shripad Paropkari and Adv Atul Sanap were present.

Apart from Nashik, social activists and institutions from Mumbai, Dhule and Thane were honoured with Maitri Sanman, given by Mudray Yuva Foundation. The foundation honours individuals, institutions for their immense contribution in the social arena.

Aditi Deore and Sunil Pardeshi anchored the programme, while Shivanjali Yuvak Mitra Mandal, Eknishtha Foundation, Aasra Foundation, Nisargsevak Yuva Manch, Aai Godamai Sanstha (Nashik), Chhava Sanghatana, Daivat Foundation among others took initiative. Kavita Patil proposed a vote of thanks.

Maitri Sanman awardees: Kiran Patil, Rahul Wagh, Vishwas Ahire, Pintu Thorat, Chetan Sonar, Suresh Shirude, Pritam Bhamare, Sagar Bodke, Vishal Patil, Ashwini Baviskar, Kachru Vaidya, Vikas Sonje, Ashwini Choumal, Sachin Mahajan, Shivam Patil, Vijay Ingale, Sunita Patil, Bharati Devkar, Ayesha NGO, Vaishali Chavan, Suvarna Vishwasrao and M D Mhatre among others.

भूमिपुत्रांना रोजगारासाठी विशेष कायदा आणणार – राज्यपाल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : ‘भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आरक्षणााचा विशेष कायदा आणणार असल्याचे आश्वासन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेत दिले. तसेच अवकाळी पावसामुळे आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीस आर्थिक साहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध असेल असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले. महत्वाचे म्हणजे राज्यपालांनी मराठीतून अभिभाषण केले.

ते विधानसभेत सुरु असलेल्या विशेष अधिवेशना दरम्यान बोलत होते. सकाळच्या सुमारास विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यानंतर संध्याकाळी ०४ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषण केले.

ते यावेळी म्हणाले कि बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करुन देणारा असून भूमिपुत्रांसाठी आरक्षण ठेवण्यासाठी कायदा करणार आहोत, त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचे त्यांनी अभिभाषणात सांगितले. मुख्यमंत्री रस्ते निर्माण योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, अल्पदरात वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालये महाविद्यालये देखील निर्माण केले जातील असेही त्यांनी सांगितले.

Fitness first for people at city’s jogging tracks, gyms

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK ROAD:

As the city’s temperature level has been hovering around 15.0 degrees Celsius for the past several days signalling colder days ahead, the Nashikites having greater awareness about fitness and healthier lifestyle are wasting no time in approaching to their nearest jogging tracks, green gyms to reap benefits out of regular exercise which is healthier especially during winter.

A number of women enthusiasts working out at playgrounds, jogging tracks and green gyms this season is significant due to increasing health awareness among them. The children, on the other hand, giving preference to cricket, football and kabaddi, while the tiny-tots flocking public parks.

Joining a gym or any other fitness facility is one way to beat the cold because training indoors cancels out the cold weather. There are cardio machines, treadmills, bicycles, ellipticals, rowing machines, stair masters, weight machines, free weights and group training classes the gym lovers are now preferring as their best fitness mantra.

Some jogging tracks in the city are playing the role of an entertainer and motivating the joggers. In some tracks, there are music systems installed so that joggers can listen to music while running. Golf Club ground, Indiranagar jogging track, Nashik Road playground behind Mukti Dham and Shikharewadi ground in the city, in particular, are now flooded with gym lovers to keep themselves fit and healthy.

पारोळा : तरडी येथे सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पारोळा (प्रतिनिधी) –

तालुक्यातील तरडी येथील (२३) वर्षीय शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या शेतात सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दि.1 रोजी सकाळी सहा वाजता घडली.

येथील समाधान ईश्वर पाटील (वय २३) हा तरूण दररोज पहाटे त्याच्या जोगलखेडे रस्त्यावरील तरडी शिवारातील शेताजवळ जाऊन शेतातील इलेक्ट्रिक मोटार सुरू करून पाणी लावून व्यायाम करत होता, त्याप्रमाणे आजही पहाटे समाधान आपल्या मित्रांसोबत व्यायामासाठी गेला असता मित्रांना सांगितले कि मी  मोटर चालू करून येतो तो उशिरापर्यंत न आल्याने मित्रांनी शेताकडे जाऊन पाहिले असता तो बेशुद्धावस्थेत पडलेला दिसला. व त्यास सर्पदंश झाल्याचे दिसून आले.

समाधानला या स्थितीत बघीतल्यानंतर मित्र जय गुलाब पाटील याने नातेवाईकांना सांगितल्यानंतर गावातील शशिकांत लोटन पाटील,  सुभाष वामन पाटील, विलास नथू पाटील, डॉक्टर पि.के पाटील, दिलीप पाटील  यांनी त्यास पारोळा  कुटीर  रुग्णालयात  दाखल केले असता त्यास डॉक्टर योगेश साळुंखे यांनी तपासून मृत घोषित केले.

याबाबत पारोळा पोस्टेला  किरण रविंद्र पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल आशिष चौधरी हे करीत आहेत.

त्याच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे घरचा कर्ता मुलगा गेल्याने आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला, तरडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Video: Balanced diet and exercise must in winter: Experts

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

The mercury in district is dropping slowly. The chills can be experienced in night. The weather department has also said that the temperature will drop further in district. The diet and exercising becomes very important in this condition to tackle with the cold and maintain immunity. Frequency of outbreak of various diseases especially related to Acute Respiratory Disease (ARI) increases in winter. I such condition Deshdoot in its special segment of Deshdoot Samwad Katta had a discussion on diet and exercising during the winter.

The experts explained that the food, nutrition and exercising in winter both are very important. One should forget about dieting during winter to maintain the immunity and gather energy to tackle with cold. The panel included the technical advisor at AYUSH wellness hub Delhi, Dr Abhay Kulkarni, Dr Sushma Duggad who runs a laughter club in city and gives laughter therapy, Dr Sagar Bhalerao a pediatrician and fitness trainer Krishna Nagare. The panel discussed that the diet is very important during winter. In Ayurveda, the winter has been explained a season of nature to gain energy. The dieting plans should be avoided during winter. The food like oily food, sweets, staples, fatty foods, dry fruits, seasonal fruits and such healthy food should be included in diet. With that exercise is also important with the proportion of the food one it.

Keeping the skin and muscles healthy is also very important. The muscles get stiff during winter and muscle pain very common during winter due to cold. It is very important to massage yourself with oil during winter to keep your skin and muscle healthy. Just applying simple oil on body is enough, said expert during the discussion.
The children are very vulnerable to diseases during winter. It is very important to keep them safe and healthy during winters. The ground activities have gone very less in children. The parents should give time to their children take them to garden, play with them to keep them fit for winter. The temperature shift in winter affects the children and elderly people.

The laughter yoga is another good option for the elderly during winter. The laughter therapies can keep them healthy and stress free in winter. The blood circulation also improves with it said an expert. The Deshdoot Samwad Katta summarized that the exercising as well as diet is very important during winter. One should find the balance of diet and exercising as per their body requires. The Nashikites are requested from Deshdoot to stay health, eat healthy and enjoy beautiful winters of Nashik.

इगतपुरी : पूर्व भागात भात कापणी अंतिम टप्प्यात; रब्बीसाठी शेतकरी सज्ज

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

इगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची भात कापणी शेवटच्या टप्प्यात असून लवकरच रब्बी पिकांच्या कमला वेग येणार आहे.

दरम्यान जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले. असेंक पिकांचे नुकसान झाले. यामध्ये अंतिम टप्प्यातील भात कापणीसाठी आलेले भाताचे पीक शेतात पाणी असल्याने सोडून गेले. परिणामी उत्पादनावर परिणाम झाला. यातून उभारी घेतलेल्या भातपिकांची सध्या कापणी सुरु असून मजुरांद्वारे काम करावे लागत आहे. यासाठी भात कापणी यंत्राचा वापर न करता २५० रुपये रोज व एक वेळेचे जेवण व जेवण न देता ३०० रुपये कोरडा रोज देऊन रोजंदारीने मजूर आणून हाता तोंडाशी आलेली भात सोंगनी करावी लागली.

काही ठिकाणी अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे अतोनात नुकसान केले. यामध्ये शेतकऱ्यांना द्राक्ष बागा तोडाव्या लागल्या. उरलेल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी जीव ओतुन प्रयत्न करीत आहेत. दिवसाची सुरवात होण्याआधीच औषध फवारणीच्या कामकाजाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे .रात्री उशिरापर्यंत शेतकरी शेतात पिकांकडे लक्ष देवून असतात. परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे .

अनेक भागांत भौगोलीक रचनेनुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरु झाला आहे. रब्बी हंगामात गहु, हरभरा, कांदे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीतही भाजीपाला फळभाज्या घेण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. अवकाळी पावसाने उन्हाळ कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांद्यासाठी शेती पडून राहण्यापेक्षा अनेक शेतकरी गहु, हरभरा या पिकांना पसंती देत आहेत.

भात शेतीत ओलावा व पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भात कापणी, हारवेस्टर मशीन ऐवजी प्रती मजूर २५० रुपये रोज व एक वेळेचे जेवण,जेवण न देता ३०० रुपये कोरडा रोज देऊन रोजंदारीने भात सोंगनी व भातशेतीची कामे करावी लागली.
– सतिश बांबळे टाकेद

“यंदा अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला असला तरी रब्बीसाठी जोरदार तयारी करीत आहे. अवकाळी पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान केले असले तरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, तसेच इतर भाजीपाला पिकवणायसाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
– दिलीप बांबळे, शेतकरी, टाकेद बु.