Friday, May 9, 2025
Home Blog Page 60

Aaditya Thackeray : देशात वाद निर्माण करुन सत्ता स्थापण्याचे काम – आदित्य ठाकरे

0
Aaditya Thackeray : देशात वाद निर्माण करुन सत्ता स्थापण्याचे काम - आदित्य ठाकरे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशातील हरियाणा, दिल्ली, मणिपूर, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये २०१३ पासून सातत्याने वाद निर्माण करुन सत्ता स्थापन करण्याचे काम केले जात आहेत. आज महाराष्ट्रात (Maharashtra) वाद निर्माण केले जात आहे. सामान्यांना दंगली,आंदोलने,जातीय वादांत अडकवण्याचे काम केले जात आहे. नाशिकमध्ये (Nashik) दंगल (Riot) घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागपूरमध्ये घडलेली दंगल हे सर्व त्याच दिशेने चाललेले आहे. शिवसैनिकांनी सावधान होत, हा डाव उधळण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात केले.

पुढे ते म्हणाले की, “औरंगजेबाची कबर हे आपल्या शौर्याचे प्रतिक राज्यावर चालून येणार्‍याला असाच गाडला जाईल हे सांगणारी शौर्यगाथा पूसण्याचा प्रयत्न आहे. जातीपातीचे राजकारण (Political) करुन जातीजातीत विष पेरण्याचे काम भाजपा (BJP) करीत आहे. जिल्हा, समाज, जात, पात, मंदिर मस्जिद या भांडणात लोकांना गूंतवून ठेवायचे आपण बेरोजगार राहणार आपला आवाज दाबला जाणार हे प्रकार घडवले जात”, असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजवर आपल्या मुख्यमंत्र्यांचे पहिले १०० दिवस ‘हनिमून पिरिएड’ म्हटले जात होते. या सरकारच्या काळात पहिल्या १०० दिवसात काय झाले ? एक तरी योजना आली का? या सरकारने शेतकर्‍यांसाठी,तरुण-तरुणींसाठी एकतरी चांगली योजना आणली आहे का? लाडकी बहीण योजना २१०० सांगून आता ५०० रुपयांवर आणली. आम्ही तर तीन हजार देणार होतो. याला निर्लज्जपणा म्हणतात. याच्यापैकी कोणीतरी न्यायालयात (Court) जाईल आणि न्यायालयातून योजना बंद पाडतील. हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेले आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी समुळ नष्ट केलेल्या गँगवॉरने पून्हा डोके वर काढले आहे. राज्याला मणिपूर करायचा प्रयत्न सूरु आहे. खून, दरोडे, मारामार्‍या, बालात्कार सारख्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अश्या वातावरणात मोंठ्या गुंतवणूका राज्यात कश्या येतील? आपल्याला पूढच्या २० वर्षांचा विचार करायचा आहे. राज्यात परस्परांत लोप पावत चाललेला संवाद आणायचा आहे. विरोधकांनी कितीही थयथयाट केला तरी आपल्याला प्रवाहाच्या विरुध्द वाहण्याची ताकद आणायची असल्याने त्यासाठी सर्वांनी सज्ज होण्याचे आवाहनही आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले.

Jayant Patil : “सरकार आत्मचिंतन करणार का? कारण इथे…”; जयंत पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल

0

मुंबई । Mumbai

जालना जिल्ह्यातून एक मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानातून जवळपास ५० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी अनुदानाची रक्कम हडप केल्याचा गंभीर आरोप आहे. उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनीही या अपहाराची कबुली दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या निधीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून अनुदान वितरणात हेराफेरी करण्यात आली. एकाच शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळे VK नंबर तयार करून अनधिकृत अनुदान वितरित करण्यात आलं. इतकंच नव्हे, तर ज्यांच्याकडे जमीन किंवा फळबागच नाही अशा नावांवरही अनुदान मंजूर करण्यात आलं.शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली असून, प्राथमिक तपासातच मोठ्या अपहाराची माहिती समोर आली आहे. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे.

या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिलं, अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनानं सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. यातील मंजूर अनुदानातून जवळपास सुमारे ५० कोटी रुपये अधिकाऱ्यांनी लंपास केल्याची माहिती खुद्द उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांच्या या पैशावर डल्ला मारला आहे. याबाबतची सत्यता शासनाने पडताळावी. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. चारही बाजूने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम होत आहे. सरकार आत्मचिंतन करणार का? कारण इथे कुंपणच शेत खात आहे.

सध्या जिल्हा प्रशासनाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. अपहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची शक्यता आहे. अनुदानाच्या वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी नवे उपाययोजना राबवण्यावर भर दिला जात आहे. हा प्रकार समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. शासनाच्या मदतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना असा धोका निर्माण होणं हे चिंतेचं कारण आहे.

Nashik News : विकासकामांच्या सर्वेसाठी स्वतंत्र पॅनल; मंजुरीसाठी प्रस्ताव महासभेत

0
Nashik News : विकासकामांच्या सर्वेसाठी स्वतंत्र पॅनल; मंजुरीसाठी प्रस्ताव महासभेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका (Nashik NMC) देत असलेल्या नागरी सुविधा व तसेच झालेल्या विकासकामांचे सर्वेक्षण करण्यासाठी मनपाच एक स्वतंत्र पॅनल तयार करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महासभेवर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. विकास आराखड्यातील झालेली व होऊ घातलेली विकासकामे यांचे सर्वेक्षण करुन त्यात सुसूत्रता आणणे हा उद्देश ठेवून पॅनल तयार करण्यात येत आहे.

महापालिकेचे विकास आराखड्यानुसार (Development Plan) कार्यक्षेत्र सुमारे २६७.४८ चौ.कि.मी. असून नागरी विकास झपाट्याने होत आहे. मनपाकडून विकासकामांमध्ये इमारती, रस्ते, पदपथ, शाळा, क्रीडांगण, दवाखाने, उद्याने, पार्क, तरणतलाव, स्मशानभूमी, दफनभूमी, गटारी, पाइपलाइन, सिवेज ट्रिटमेंट प्लैट, वॉटर ट्रिटमेंट प्लॅट, पाण्याच्या टाक्या या बाबींचा समावेश होतो.

तसेच, खासगी जमिनींचे विकास आराखड्यानुसार जमीनमालक अथवा विकास मार्फत अभिन्यासांचे विकसन होऊन नवीन नागरी वस्ती तयार होत असते. विकासकामे व सुविधा देण्यासाठी अस्तित्वातील स्थितीचे तसेच विकास आराखड्यानुसार प्रस्तावित प्रयोजनांचे पूरक व आवश्यक रेखांकन नकाशे तयार करणे, मोजमाप व सर्वेक्षणाची कामे करावी लागतात. त्यासाठी महापालिका सर्वेक्षण (Survey) पॅनल गठित करणार आहे. त्यासाठी सर्वेक्षकास विकास आराखडाविषयक, जमीन मोजणी, आदी कायदेविषयी माहिती असावी.

अनुभवी, कुशल तांत्रिक मनुष्यबळ

एजन्सीकडे सर्वेक्षण काम करणेसाठी अनुभवी, कुशल तांत्रिक मनुष्यबळ असावे अद्ययावत तांत्रिक उपकरणे असावीत. या प्रमुख अर्टी, शर्ती असून त्यात जी संस्था पात्र ठरेल, तिचा पुढील पाच वर्षांसाठी पॅनलमध्ये समावेश केला जाणार आहे. नकाशा प्रमाणित करणे व आरक्षित क्षेत्रानुसार जागेवर डिमार्केशन, डी. पी. रस्त्यात जाणारे क्षेत्र निश्चित करणे, संरेषा निश्चित करणे व डिमार्केशन करणे. डी. पी. रस्त्यात तसेच आरक्षणाखाली जाणाऱ्या क्षेत्राचा तपशील निश्चित करून टीडीआर देणे कामी सर्वेक्षण नकाशा तयार करणे, डीपी रिपोर्टमध्ये दर्शविल्यानुसार आरक्षण क्षेत्राची मोजणी करणे, क्षेत्र निश्चिती करणे, भूसंपादन करण्यासाठी प्रस्ताव तयार करणे, मनपामार्फत भूमी अभिलेख खात्याकडून संयुक्त मोजणी करणे आदी कामांचा समावेश राहणार आहे, कामाच्या पूर्णतेवर व प्राथमिक नकाशे सॉफ्ट व हार्ड कॉपी सादर केल्यावर सत्तर टक्के व कामाच्या पूर्णतवर व अंतिम नकाशे सादर केल्यावर उर्वरित तीस टक्के शुल्क अदा केले जाईल.

Nashik News : झोपडीत राहणारा योगेश सोनवणे चीनमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व; जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

0

नाशिक | Nashik

घरात अठरा विसे दारिद्र्य.. आई-वडील शेतमजूर.. रहायला छोटीशी झोपडी.. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अंतापूर-ताहाराबाद येथील एका आदिवासी कुटुंबातील योगेश नामदेव सोनवणे या १७ वर्षीय विद्यार्थ्याने (Student) अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय माउंटन (बाइक) सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्रांझ आणि सिल्वर अशी दोन्ही पदके मिळवून नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याची चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, तो आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

आंतरराष्ट्रीय माउंटन बाइक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये (International Mountain Cycling Competition) १८ वर्षांच्या आतील मुलांच्या गटात निवड होणारा योगेश सोनवणे (Yogesh Sonawane ) हा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू ठरला आहे. सायकल फेडरेशन ऑफ इंडिया आणि हरियाना सायकलिंग स्टेट असोसिएशन यांच्या वतीने मोरनी हिल्स (हरियाणा) येथे दि. २८ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान २१ व्या सिनियर, ज्युनियर आणि सब ज्युनियर राष्ट्रीय माउंटन (बाइक) सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १८ वर्षांच्या आतील वयोगटामध्ये योगेश सोनवणे या विद्यार्थ्याने अप्रतिम कामगिरी करीत क्रॉस कंट्रीमध्ये ब्रांझ आणि टीम रिलेमध्ये सिल्वर या दोन्ही पदकांवर आपले नाव कोरले.

दरम्यान, या स्पर्धेतील यशस्वी कामगिरीमुळे एशियन सायकलिंग फेडरेशनच्या वतीने दि.२३ ते २७ एप्रिल दरम्यान चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई माउंटन (बाइक) सायकलिंग स्पर्धेसाठी योगेशची निवड झाली आहे. नुकताच तो चीनला (China) रवाना झाला असून, योगेशला मोठा भाऊ भरत सोनवणे, क्रीडाशिक्षक प्रशांत कुमावत, क्रीडाशिक्षक गणपत आहेर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर नितीन नागरे, तुकाराम नवले यांच्यासह आदींकडून त्याला वेळोवेळी आर्थिक मदतही झाली आहे.

मविप्रच्या ताहाराबाद कॉलेजचा विद्यार्थी

योगेश सोनवणे हा मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित ताहाराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वी कला शाखेत शिक्षण घेत आहे. तसेच, नाशिक जिल्हा विनायक कार्य समिती, सटाणा संचलित अंतापूर येथील जनता विद्यालयात इयत्ता दहावीला असताना योगेशने प्रथमता राज्यस्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेले आहे.

पदके वाढवताहेत झोपडीची शान

तीन वर्षांमध्ये योगेशने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, शेकडो पदके मिळविली आहेत. २०२४ मध्ये पंचकुला (हरियाणा) येथे झालेल्या १६ वर्षांच्या आतील स्पर्धेतही योगेशने क्रॉस कंट्री, टाइम ट्रायल, टीम रिले या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले आहे. अत्यंत मेहनतीने पटकावलेली मोलाची पदके, प्रमाणपत्रे सुरक्षितपणे ठेवायलादेखील झोपडीवजा घरामध्ये जागा नसल्याचे दिसून येते.

Sagarika Ghatge And Zaheer Khan Son : लग्नानंतर ७ वर्षांनी सागरिका घाटगे व झहीर खान झाले आई-बाबा! मुलाचे ठेवले ‘हे’ नाव

0

मुंबई । Mumbai

भारताचा माजी क्रिकेटपटू झाहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या प्रसिद्ध जोडप्याने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला असून, त्यांच्या कुटुंबात नवीन सदस्याचे स्वागत करण्यात आले आहे.

या आनंदाच्या बातमीची माहिती खुद्द झाहीर आणि सागरिकाने इंस्टाग्रामच्या माध्यमातून दिली. बुधवारी दोघांनी एक फोटो शेअर करत त्यांच्या मुलाच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली. या फोटोमध्ये झाहीर खान आपल्या मुलाला मांडीवर धरून बसलेला दिसतोय, तर सागरिका त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभी आहे. या क्षणामध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.

या फोटोसोबत त्यांनी लिहिलं आहे, “प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादाने आम्ही आमच्या गोंडस मुलाचे म्हणजेच फतेहसिंह खानचे स्वागत करतो.” या भावनिक संदेशामुळे अनेकांनी त्यांच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सागरिका आणि झाहीरच्या या आनंददायी बातमीवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेते अंगद बेदी यांनी “वाहेगुरू” असे म्हणत त्यांचे अभिनंदन केले. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही “तुम्हा दोघांचे अभिनंदन” अशी कमेंट केली.

याशिवाय, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चाहत्यांनी देखील त्यांचे हार्दिक स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या पोस्टवर हजारो लाईक्स आणि शेकडो कमेंट्स आल्यात.

झाहीर खान आणि सागरिका घाटगे हे २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या प्रेमकहाणीने अनेक चाहत्यांची मनं जिंकली होती. लग्नानंतर हे दोघं नेहमीच एकमेकांसोबतच्या क्षणांना सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

फतेहसिंह खान या छोट्या राजकुमाराच्या आगमनामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. चाहत्यांना आता त्यांच्या लाडक्या स्टार्सच्या या नव्या भूमिकेमधील प्रवास पाहायला मिळणार आहे.

झाहीर आणि सागरिका दोघेही त्यांच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आहेत. झाहीरने भारतीय संघासाठी अनेक विजयी सामने खेळले असून तो एक कुशल गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तर सागरिका घाटगेने ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळवली आणि ती अभिनय क्षेत्रात आपले स्थान पक्कं करत गेली.

Shiv Chhatrapati Awards : राज्य सरकारचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर; नाशिकच्या पाच जणांचा समावेश

0

मुंबई | Mumbai

राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे (Minister Dattatreya Bharane) यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२३-२४ च्या (Shiv Chhatrapati Sports Awards 2023-24) पुरस्कारांची घोषणा केली आहे. शुक्रवारी १८ एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात या पुरस्कारांचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.

माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शकुंतला खटावकर (Shakuntala Khatavkar) यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पॅरा ऑलिम्पिक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते अदिती स्वामी, ओजस देवतळे, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जायस्वाल, यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने (Awards) गौरवण्यात येणार आहे. एकूण ८९ पुरस्कारांची घोषणा क्रीडा मंत्री भरणे यांनी केली आहे.

दरम्यान, या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे देखील हजर असणार आहेत.

नाशिकच्या पाच जणांचा समावेश

राज्य सरकारचा महत्त्वाचा मानला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नाशिकच्या पाच जणांना जाहीर झाला आहे. त्यामध्ये इंग्लिश खाडी पार केल्याबद्दल तन्वी चव्हाण-देवरे यांना तर ऋतिका रवींद्र गायकवाड यांना सायकलिंग या क्रीडा प्रकारात पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच मृण्मयी साळगांवकर यांना रोइंग, दिलीप महादू गावित यांना पॅरा मैदानी आणि आकाश शिंदे यांना कबड्डी या क्रीडा प्रकारात शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.

शकुंतला खटावकर जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी

राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा आणि त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे. राज्यात वर्ष २००१ पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार दिले जातात. पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. १९७९ ते ८२ कालावधीत १०६ राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल आठ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. १९७८ मध्ये केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.

पुरस्काराचे स्वरूप काय असते?

जीवन गौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये, शिवछत्रपती पुरस्करासाठी तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून शासनाचा उद्देश राज्यातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणे आणि इतरांनाही क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देणे हा आहे. या क्रीडा पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, मार्गदर्कसाठी जिजामाता पुरस्कार, खेळांडूसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा  पुरस्कार आणि दिव्यांग खेळांडूसाठी देखील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराने गौरवण्यात येणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र यासह भरीव रक्कमही देण्यात येते.

शिवछत्रपती पुरस्कार कोणाला दिला जातो?

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड त्यांच्या मागील वर्षातील उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश, सातत्य आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांसारख्या निकषांवर आधारित असते. विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंच्या योगदानाला आणि त्यांच्या कठोर परिश्रमाला समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या खेळांचा समावेश असतो.

Amol Mitkari : “त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना?; अमोल मिटकरी यांची खोचक पोस्ट

0

मुंबई । Mumbai

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर सांगलीत सोमवारी भटक्या कुत्र्याने हल्ला केला. माळी गल्लीमधून जात असताना अचानक एका कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात हलचल निर्माण झाली आहे. भिडे समर्थक आणि विरोधकांमध्ये नव्याने शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाजमाध्यम ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर टाकलेल्या पोस्टमुळे वातावरण तापले आहे.

“त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? …..जो कुणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का?, अशी पोस्ट मिटकरी यांनी समाज माध्यम एक्सवर केली आहे. त्या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. एकूणच या मुद्दावरून शिवप्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधकांत नवीन वाद उफाळला आहे.

https://twitter.com/amolmitkari22/status/1912341537620652362

या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. भिडे समर्थकांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, अनेकांनी मिटकरींवर टीका केली आहे. काहींनी मात्र त्यांच्या उपरोधिक शैलीचे समर्थन करत भिडेंच्या वादग्रस्त विधानांची आठवण करून दिली आहे.

याआधीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांवरून मिटकरी यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वादाची पार्श्वभूमी आधीपासूनच होती. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा हा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

संभाजी भिडे कोण आहेत?

संभाजी भिडे हे पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व मानले जातात. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि बेळगाव या भागांमध्ये त्यांचे मोठे समर्थक आहेत. त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली असून, ती संस्था छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचे प्रसारक म्हणून कार्य करते.

राजकीयदृष्ट्या भिडे यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी संबंध राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना ‘गुरुजी’ म्हणून संबोधतात. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उदयनराजे भोसले, आर.आर. पाटील आणि पतंगराव कदम यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र, त्यांनी कधीही प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला नाही.

Aaditya Thackeray : “महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या…”; आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल

0
Aaditya Thackeray : "महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या..."; आदित्य ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल

नाशिक | Nashik

शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) एक दिवसीय विभागीय निर्धार शिबिर नाशिकमधील गोविंदनगर भागातील मनोहर गार्डन लॉन्स येथे पार पडत आहे. या शिबिरास संध्याकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर शिबिराचे उद्घाटन पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांच्या हस्ते पार पडले. यानंतर त्यांनी महाराष्ट्र कुठे चाललाय? या विषयावर भाषण करताना मुंबईतील रस्ते घोटाळा आणि विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, “ईशान्य मुंबईनंतर नाशिकमध्ये आपले शिबीर होत आहे. आपण खरंतर मैदानातील माणसे आहोत. परंतू, दिशा ठरविण्यासाठी आपली वाटचाल ठरविण्यासाठी जिल्ह्यात, विभागात असे शिबीर झाले पाहिजे. मी कोणत्या विषयावर बोलायचे यासाठी राऊतसाहेबांना फोन केला. त्यावेळी मी म्हणालो, संजयकाका उद्या कोणत्या विषयावर बोलायचं? ते लगेच बोलले, महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या विषयावर बोला. मला लहानपणापासून राजकारणाची आवड होती. ७ ते १० वर्षाचा असल्यापासून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत गाडीत, विमानात बसून दौऱ्यावर निघून जायचो. एकदा दहावीच्या परीक्षेच्या चार दिवस आधी वडिलांसोबत श्रीवर्धन दौऱ्यावर गेलो होतो” अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.

पुढे ते म्हणाले की, “आजवर आपल्या मुख्यमंत्र्यांचे (CM) पहिले १०० दिवस हनिमून पिरेड म्हटले जात होते. या सरकारच्या काळात पहिल्या १०० दिवसात काय झाले ते बघा, एक तरी योजना आली का? या सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? तरुण-तरुणींसाठी एकतरी चांगली योजना आणली आहे का? लाडकी बहीण योजना आता ५०० रुपयांवर आणली. आम्ही तर तीन हजार देणार होतो. एकही गोष्ट अर्थसंकल्पात आणत नाही, याला निर्लज्जपणा म्हणतात. याच्यापैकी कोणीतरी न्यायालयात जाईल आणि न्यायालयातून योजना बंद पाडतील. हे सरकार निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आशीर्वादाने बसलेले आहे”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

ते पुढे म्हणाले की, “निवडणूक नसताना कर्जमाफी देणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. महिलांवर अत्याचार होत असल्याच्या विरोधात सर्वात कडक शक्ती कायदा आणणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. नाशिकमधे स्मार्ट सिटी योजना पूर्ण झाली आहे का? सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना सुरू आहे. जात धर्म, तालुका जिल्हा आशा वादात व्यस्त ठेवले जात आहे. इंग्रजांच्या नीतीप्रमाणे तोडा, फोडा आणि राज्य करा, असा राज्य कारभार केला जात आहे. पुण्यात (Pune) एका महिलेवर अत्याचार झाल्यानंतर गृहराज्यमंत्री म्हणतात शांततेत पार पडलं, म्हणून कुणाला काही कळले नाही. यावरून हे सरकार तुमचं आहे असं वाटतं का? गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची असून, रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे”, अशी घणाघाती टीकाही आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

Nashik News : सरपंचपद आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर; जिल्ह्यात १,३८७ ग्रामपंचायती, ‘या’ तारखांना सोडत

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील (District) बिगर अनुसूचित क्षेत्रातील ८१० आणि अनुसूचित क्षेत्रातील ५७७ अशा एकूण १,३८७ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यातच महिला सरपंचपदाचेही आरक्षण (Reservation) काढले जाणार आहे. प्रथम २१ एप्रिल रोजी एकत्रित आरक्षण काढल्यानंतर २३ आणि २४ ला तालुकानिहाय महिला आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.

एकूण २०२ बिगर अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीकरीता सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे त्या जागा सोडून जिल्ह्यातील इतर जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. अशा सुमारे १,३८७ जागा असून त्यांची सोडत २१ एप्रिल रोजी काढण्यात येईल. त्यानंतर महिला आरक्षण सोडत २३ व २४ एप्रिलला काढली जाईल. त्यामध्ये ७०४ जागा महिला सरपंचपदासाठी (Sarpanch) राखीव आहे.

जिल्हयातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ८१० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४१४ महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीची संख्या ५७७ असून त्त्यापैकी २९० जागा महिलांसाठी राखीव आहेत. सोमवार दि. २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता प्रत्येक तालुक्यात आरक्षण (Taluka Reservation) सोडत सभा तहसील कार्यालयात होणार आहे.

दरम्यान, तहसीलदारांच्या उपस्थितीत इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, चांदवड, दिंडोरी, नाशिक, निफाड, बागलाण, मालेगाव, येवला या तालुक्यात महिला आरक्षण सोडत २३ एप्रिलला १२ वाजता तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, चांदवड, निफाड, येवला येथे दि. २४ रोजी महिला आरक्षण सोडत होणार आहे.

बिगर अनुसूचित क्षेत्राबाहेरील जागा

अनुसूचित जाती – ५४
अनुसूचित जमाती – १०७
नागरिकांचा मागास प्रवर्ग – २१८
सर्वसाधारण प्रवर्ग – ४३१
एकूण जागा – ८१०
अनुसूचित जमाती आरक्षण एकूण जागा – ५७७
महिला आरक्षण – २९०

Sanjay Raut : संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, “नाशिकच्या दर्ग्यावर बुलडोझर फिरवण्यासाठी…”

0

नाशिक । Nashik

नाशिकमधील अनधिकृत दर्ग्यावरील बांधकाम हटवण्याची कारवाई बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली. या वेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, ज्यात काही पोलिस जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

दुसरीकडे, नाशिकमध्ये आज शिवसेना (ठाकरे गट) चे एक दिवसीय निर्धार शिबिर सुरू आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

राऊत म्हणाले, “शिबिरात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्हाला घाबरवण्याचा हेतू आहे. दर्ग्यावर कारवाईसाठी आजचाच दिवस का निवडला? हे सर्व लक्ष विचलित करण्यासाठीचे डावपेच आहेत.”

त्यांनी पुढे म्हटले, “दर्ग्यावर बुलडोझर चालवून शहरात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर हिंमत असेल, तर समोर येऊन लढा. आम्ही तयार आहोत.”

राऊतांनी हा मुद्दा उपस्थित केला की, पंधरा दिवसांची नोटीस आधीच देण्यात आली होती, मात्र कारवाई शिबिराच्या दिवशीच का केली? “भाजप नेहमीच मुहूर्त काढतो, दंगल कधी घडवायची, हे आधीच ठरवतो,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल झालेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. यावर राऊत म्हणाले, “ते आमरस पुरी खायला भेटले असावेत. युती झाली तर बघू. सध्या अमित शाहच तीन पक्ष चालवत आहेत.” शिवसेना ठाकरे गटाच्या शिबिरावर या कारवाईचा कोणताही परिणाम होणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.