Saturday, July 27, 2024
Homeनगरपाथर्डी, शेवगाव तालुक्यांत सरसकट पंचनामे व्हावेत

पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत सरसकट पंचनामे व्हावेत

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात यावर्षीच्या हंगामातील पावसाच्या प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असुन पिके करपली आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील सर्वच महसुल मंडळात सरसकट पिकांचे पंचनामे करण्यात येवुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

- Advertisement -

याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील 1 लाख 26 हजार 285 शेतकर्‍यांनी 57 हजार 395 हेक्टर व शेवगाव तालुक्यातील 92 हजार 90 शेतकर्‍यांनी 53 हजार 372 हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा भरला आहे. शासननिर्णय पिक विमा मुद्दया अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थीती व पावसातील खंड याबाबी अंतर्गत दोनही तालुक्यातील सर्व महसूल मंडळाची पिक विमा पंचनाम्यासाठी निवड होणे गरजेचे आहे. असे आसतांनाही काही मंडळांची निवड झालेली नाही.

मंडळ स्तरावरील पर्जन्यमापकाच्या आधारे नोंदलेल्या पावसाचा निकष न लावता पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांचे पंचनामे होणे अत्यंत गरजेचे आहे. पाथर्डी तालुक्यातील सहा मंडळापैकी फक्त पाथर्डी या एकच मंडळाचा पिक विमा पंचनाम्यासाठी समावेश झाला आहे. तर शेवगांव तालुक्यातील शेवगांव, बोधेगाव, एरडगांव या तीनच मंडळाचा समावेश आहे. पाथर्डी तालुक्यातील माणिकदांडी, टाकळीमानूर, मिरी, करंजी, कोरडगांव तसेच शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव, चापडगांव व ढोरजळगांव ही महसूल मंडळे वगळण्यात आलेली आहेत.

वगळण्यात आलेल्या या सर्वच महसूल मंडळात यावर्षीच्या हंगामात अत्यंत कमी पावसाअभावी पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले असून पिके करपली आहेत. त्यामुळे सर्वच महसूल मंडळातील पिकांचे पंचनामे होणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे.तरी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत पाथर्डी व शेवगांव तालुक्यातील वगळ्यात आलेल्या वरील सर्वच महसूल मंडळातील पिकांचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी व विनंती आमदार मोनिका राजळे यांनी मुंडे यांच्याकडे केली आहे.

पिक विमा निवड ही महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापकाच्या साहयाने घेतली आहे. परंतु मंडळ स्तरावर एकच पर्जन्य मापक बसविलेले असते त्यानुसार त्या मंडळातील 20 ते 25 गांवाचे पर्जन्यमान धरले जाते. परंतु मंडळातील अनेक गांवामध्ये पाऊस पडलेला नसतांनाही केवळ मंडळ स्तरावरील एका गावातील पर्जन्यमापकाच्या आधारे नोंदलेल्या पावसाचा निकष चुकीचा आहे.

– आ. मोनिका राजळे

- Advertisment -

ताज्या बातम्या