Wednesday, June 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : "पक्षात फुट पडेल असं..."; अखेर शरद पवार राष्ट्रवादीच्या विभाजनावर...

Sharad Pawar : “पक्षात फुट पडेल असं…”; अखेर शरद पवार राष्ट्रवादीच्या विभाजनावर बोललेच, नेमकं काय म्हणाले?

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंगही फुंकलं

पुणे | Pune

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचा वर्धापन दिन सोहळा आज (मंगळवार) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरात पार पडला. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत विविध विषयांवर भाष्य केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी (Local Body Election) तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले. याशिवाय जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबतही शरद पवार यांनी सुतोवाच केले.

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी देतो. महाराष्ट्राचा चेहरा बदलणाऱ्यांना कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा (Worker) हा पक्ष आहे. तुम्हा सगळ्यांच्या बांधिलकीवर आणि कष्टावर हा पक्ष उभा आहे. सामान्य माणसाला संधी मिळाली की तो कर्तुत्व दाखवू शकतो. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुका दोन ते तीन महिन्यावर आल्या आहेत. तिथे ५० टक्के भगिनींना निवडून द्यायचे आहे. त्यांना संधी दिली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय आपल्याला यशस्वी करायचा आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी म्हटले.

पुढे शरद पवार म्हणाले की, “पक्षांमध्ये (Party) फूट पडेल असं कधीच वाटतं नव्हते. मात्र, काही विरोधी विचारांसोबत गेली आणि ही फूट पडली. त्यावर मला अधिक भाष्य करायचे नाही, जे राहिले ते विचारवादी राहिले”, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला लगावला. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी १९८० सालचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, १९८० साली माझ्या हातात सत्ता नव्हती, त्याआधी होती. निवडणुका आल्या, ५० आमदार निवडून आले. सहा शिल्लक राहिले, बाकी पक्ष सोडून गेले. सहा राहिले त्यामधील एक मला याठिकाणी दिसत आहे ते म्हणजे कमल किशोर कदम. आमचा पक्ष सहा जणांवर आला. यानंतर पुन्हा निवडणूक आली. राष्ट्रवादीची संख्या ७२ झाली. त्यानंतर राज्य सरकारमध्ये (State Government) पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे चिंता करु नका. आपण एकसंध राहू, जनतेशी बांधिलकी ठेवायची आहे” असेही शरद पवारांनी सांगितले.

जयंत पाटलांचे केले कौतुक

शरद पवार म्हणाले की, “जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले आहे. त्यांनी दहा वर्ष अर्थमंत्री म्हणून काम पाहिले आहे. विरोधी बाकावर बसूनही त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर प्रमुख सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार असून, प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात नवी फळी तयार करू”, असे त्यांनी सांगितले.

खासदार निलेश लंकेंच्या घरी कुणी गेलं आहे का?

तुम्ही अहिल्यानगरच्या खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे भाषण ऐकले असेल. तुम्ही कोणी कधी त्यांच्या घरी गेले आहात का? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला आणि म्हणाले की, “एका लहानशा घरात, एका खोलीत राहणारा, रात्री दोन वाजेपर्यंत लोकांचं काम करणारा कार्यकर्ता म्हणून खासदार निलेश लंके यांच्याकडे पाहिलं जातं. निलेश लंके यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे आपल्या पक्षाचा मौल्यवान ठेवा आहेत. तुमच्यासारखे कार्यकर्ते एकसंध राहून विचाराने पुढे येतील तेव्हा सत्ता आपोआप येईल”, असेही शरद पवारांनी म्हटले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Update : मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे; मुसळधार पाऊस...

0
मुंबई | Mumbai  गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain) दडी मारली आहे. खरीप हंगामाची (Kharif Season) तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer)...