राहाता (प्रतिनिधी)
राहाता तालुक्यात आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे.
- Advertisement -
या अतिवृष्टीचा फटका नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. राहाता ते शिर्डी दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना या महामार्गावर प्रवास न करण्याचे तातडीचे आवाहन केले आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.




