Monday, June 9, 2025
Homeक्राईमSonam Raghuvanshi : हनिमुनसाठी गेली अन् नवऱ्याला कट रचून संपवलं; पोलिसांनी उत्तरप्रदेशातून...

Sonam Raghuvanshi : हनिमुनसाठी गेली अन् नवऱ्याला कट रचून संपवलं; पोलिसांनी उत्तरप्रदेशातून प्रियकरासह घेतलं ताब्यात

नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था  

- Advertisement -

मेघालयात हनिमूनसाठी (Honeymoon Couple Case) गेलेल्या इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशीची (Raja Raghuvanshi) पत्नी सोनमने (Sonam Raghuvanshi Case) सुपारी देऊन हत्या हत्या केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील तिघा जणांना सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाहा देखील सामील असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये (Ghazipur) पोलिसांनी अटक केली आहे.

राजा आणि सोनम रघुवंशी यांचे ११ मे रोजी लग्न (Marriage) झाले होते. यानंतर ते २० मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. यात प्रथम त्यांनी गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर येथून ते २३ मे रोजी मेघालयातील शिलाँगला गले. सुरुवातीला कुटुंब दोघांशी बोलत राहिले, मात्र नंतर संपर्क तुटला होता. यानंतर या जोडप्याची भाड्याने घेतलेली स्कूटी सोहरारीम परिसरात सोडून दिलेली आढळून आली. त्यानंतर २ जून रोजी वेई सोडोंग धबधब्याजवळील एका नाल्यात राजा रघुवंशीचा कुजलेला मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. तर पत्नी सोनमचा कोणताही पत्ता लागला नाही, ज्यामुळे कुटुंबाला अपहरणाचा संशय येऊ लागला होता.

दरम्यान, पोलिसांनी (Police) म्हटले की, ” सोनमचा प्रियकर राज या हत्याकांडाचा मास्टरमाईंड आहे. त्यानेच सोनमसोबत मिळून मध्यप्रदेशातील तीन जणांना राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली होती. या सर्वांनी मिळून मेघालयमध्ये हनिमूनवेळी  राजाची हत्या केली. त्यानंतर सोनम तिचा प्रियकर राज कुशवाहा सोबत पळून गेली. सोनम आणि राज हे दोघे उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गाझीपूर येथे पोहोचले, जिथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

हनिमुनच्या वेळीच रचले कारस्थान

पोलिसांच्या मते, पत्नी सोनम रघुवंशी यांनी पती राजा रघुवंशी यांना मारण्यासाठी मारेकऱ्यांना कामावर ठेवले होते. हनिमुनच्या वेळीच तिने हे कारस्थान रचले होते. असं काही विपरीत घडेल, याचा विचार सु्द्धा राजाच्या कुटुंबाने केला नव्हता. मेघालयचे (Meghalaya) सीएम संगमा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, राजा हत्याकांडात सात दिवसांत मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक केली.

आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

या प्रकरणात मेघालय पोलिसांनी विशेष तपास पथक एसआयटीची स्थापना केली होती. आतापर्यंत तीन आरोपींना इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. तर एका फरार आरोपीचा शोध सुरु आहे. सोनमला गाजीपूर येथून ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि रघुवंशी समाज सोनमची सुरक्षित घरवापसी आणि सीबीआय चौकशीची मागणी करत होते.

राजाचा भाऊ विपिनने काय म्हटले?

राजाचा भाऊ विपिनने सांगितले की, २४ मे पासून दोघांचेही मोबाईल बंद होते, त्यामुळे आम्हाला काळजी वाटू लागली. मी आणि सोनमचा भाऊ गोविंदने २५ मे रोजी इंदूरहून कारने भोपाळला गेलो. तिथून आम्ही विमानाने दिल्ली आणि नंतर गुवाहाटीला पोहोचलो. येथून आम्ही कारने शिलाँगला आलो. नंतर टॅक्सीने सोराला गेल्यावर तिथे आम्ही त्यांचा शोध सुरू केला. यावेळी आम्हाला मोपेड भाड्याने देणारा अनिल भेटला. तो आम्हाला राजाचा भाड्याने घेतलेला मोपेड सापडलेल्या ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर आम्ही त्याच मोपेडवर सोरा पोलिस स्टेशनला पोहोचलो. येथे फक्त आठ पोलिस आहेत. त्यांच्याकडे शस्त्रेही नाहीत. त्यापैकी एकानेही आमचे ऐकले नाही. त्यांनी आम्हाला आणखी शोध घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा शोध सुरू केला. आम्ही काही लोकांना त्यांचे फोटो दाखवले. चौकशी करत असताना आम्ही सोराच्या हॉटेलवर पोहोचलो. त्यावेळी हॉटेल मॅनेजरने आम्हाला सांगितले की, दोघांनी सकाळी ५.३० वाजता चेक आउट केले होते. त्याचवेळी आम्हाला संशय आला की, एक जोडपे जे कुठेतरी भेटायला आले आहे आणि ज्याचे नवीन लग्न झाले आहे, ते सकाळी ५.३० वाजता चेक आऊट कसे करू शकते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Update : राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय कधी होणार? IMD...

0
मुंबई | Mumbai राज्यात मान्सूनचा प्रवास जवळपास दोन आठवड्यापासून (Monsoon Rain) पूर्णपणे रखडल्याचे बघायला मिळत आहे. २६ मे रोजी मुंबईत धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने पहिल्याच दिवशी...