मुंबई | वृत्तसंस्था Mumbai
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडतीसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील. १३ क्टोबर २०२५ रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.
निवडणुकीसाठी १० कोटीचा निधी
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना १० कोटी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.




