अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोनानंतर आलेल्या बर्ड फ्ल्यूमुळे अफवा आणि गैरसमज अधिक पसरल्याने अनावश्यक भिती निर्माण झाली आहे.
- Advertisement -
जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायाचा विचार करता प्रसाराचा प्रमाण नगण्य आहे. प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना केलेल्या आहेत. तेव्हा गैरसमजातून लवकर बाहेर पडलेले बरे असा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.
‘सार्वमत संवाद कट्टा’ या उपक्रमात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद) डॉ.सुनील तुंभारे, कोपरगाव कार्यालयाचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.अजय थोरे व दहिगाव बोलका येथील कुक्कुटपालक शेतकरी नेताजी देशमुख सहभागी झाले. ‘सार्वमत’चे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.