Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशLairai Devi Stampede : लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी; ६ जणांचा मृत्यू, ३०...

Lairai Devi Stampede : लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी; ६ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोव्यातील (Goa) शिरगाव (Shirgaon) येथील लैराई देवी यात्रेदरम्यान (Lairai Devi Yatra) चेंगराचेंगरी झाल्याची घटना आज (शनिवारी) पहाटेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू (Death) झाला असून तीस हून अधिक जखमी झाले आहेत. या जखमींना गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, यातील १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

लैराई देवीचे मंदिर दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात (Shiroda Village) आहे. या मंदिरात दरवर्षी यात्रा असते. त्यामध्ये ४० ते ५० हजार भाविक (Devotees) सहभागी होतात. शनिवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक पोहचले. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार, एका ठिकाणी उतार असताना गर्दीतील लोक वेगाने चालू लागले होते. यामुळे गर्दीत गोंधळ निर्माण होऊन पळापळ सुरु झाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतला. तसेच डिचोली, गोमेकॉ इस्पितळात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची व जखमींची (Injured) भेट घेतली.

घटनेतील मृतांची नावे

जत्रेतील चेंगराचेंगरीत मृतांमध्ये सूर्या मयेकर (साखळी), आदित्य कवठणकर व तनुजा कवठणकर (दोघेही अवचीतवाडो-थिवी), यशवंत केरकर (माडेल-थिवी), प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे) व सागर नंदरगे (माठवाडा-पिळगाव), अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील मृत आदित्य व तनुजा हे काकू व पुतण्या असून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

शिरगाव येथील घटना अत्यंत दुर्दैवी असून उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पोलिस यंत्रणेला आपण चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच जखमींची विचारपूस केली. यावेळी पुढील तीन दिवसांसाठी मुख्यमंत्र्‍यांचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत .

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...