Saturday, May 17, 2025
Homeनगरराहुरीत कत्तलीसाठी ठेवलेल्या 20 जनावरांची सुटका

राहुरीत कत्तलीसाठी ठेवलेल्या 20 जनावरांची सुटका

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी पोलीस पथकाने (Rahuri Police Team) मिळालेल्या गोपनीय खबरीवरून राहुरी शहरातील (Rahuri) खाटीक गल्ली परिसरात छापा (Khatik Galli Raid) टाकला. यावेळी निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या 15 ते 20 जनावरांची सुटका (Release of Animals) केली. पोलिस पथकाने (Police Team) ही सर्व जनावरे ताब्यात (Release of Animals) घेतली आहेत. त्याच बरोबर या परिसरात असलेले दारूअड्डे (Alcohol Den) उद्ध्वस्त केले. या घटने बाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल (Filed a crime) करण्याचे काम सुरू होते.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना आज दि. 15 मार्च रोजी सकाळी गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली, राहुरी शहरामध्ये खाटीक गल्ली परिसरामधील मौलाना आझाद नगरमध्ये एका मोठ्या काट्याच्या झुडुपांमध्ये कत्तल करण्यासाठी असलेली 15 ते 20 जनावरे व वासरे निर्दयपणे दाबून ठेवली आहेत. याचबरोबर बाजूला असलेल्या राजवाडा परिसरामध्ये एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूविक्री होत आहे.

त्या ठिकाणी गावठी हातभट्टी बनविण्याचा अड्डा आहे, अशी माहिती मिळाली. त्यांनी ताबडतोब आरसीपी प्लटून क्रमांक तीन व चार टीमसह राहुरीचे पोलीस कर्मचारी आजिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाय, राजेंद्र डोळस, शिवाजी खरात, संतोष राठोड, दिनकर चव्हाण, नवनाथ भिताडे, सुनील निकम, जालिंदर साखरे, शेषराव कुटे यांना बरोबर घेतले. सुरुवातीला राजवाडा येथे गावठी हातभट्टी दारु बनविणारे चार अड्डे उध्वस्त केले. पोलीस आल्याचे कळताच गावठी हातभट्टी दारूविक्री करणारे पसार झाले. तसेच त्याच परिसरात असलेल्या मौलाना आझादनगर या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी पंधरा ते वीस जनावरे व वासरे मिळून आली. सर्व जनावरे पोलीस पथकाने ताब्यात घेतली आहेत. या घटनेबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या