Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ भिडणार, उपांत्य फेरी कोण...

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ भिडणार, उपांत्य फेरी कोण गाठणार?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट (Mumbai Indians and Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Delhi Capitals and Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळविण्यात येणार आहे. आरसीबी आणि दिल्लीचा सामना नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर आणि मुंबई व लखनऊचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सला आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ५ पैकी १ विजय आणि ४ पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मुंबईने दुसऱ्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्ज, सनरायझर्स हैदराबाद विरूध्द सलग ४ सामन्यात विजय (Win) संपादन करून जबरदस्त कमबॅक केले आहे. आता लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभूत करून आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपदाचा षटकार मारण्यासाठी लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज असणार आहे.

YouTube video player

विशेष म्हणजे लखनौ सुपर जायंट्स संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरूध्द पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा पराभव विसरून नव्या उमेदीने मैदानावर (Ground) उतरण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स सज्ज असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांत ७ सामने खेळविण्यात आले असून, लखनौ सुपर जायंट्स संघाचा हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास वरचष्मा राहिला आहे. उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य असणार आहे.

आरसीबी आणि दिल्ली यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत. बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बंगळूरु संघाला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी बंगळूरु मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघ बंगळूरु संघाला सलग दुसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी आणि उपांत्य फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित करण्यासाठी सज्ज असणार आहे.

दरम्यान, आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३२ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास बंगळुरू संघाने १९ तर दिल्ली कॅपिटल्सने १२ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये १० सामने खेळविण्यात आले असून, बंगळूरु संघाने ६ तसेच दिल्ली कॅपिटल्सने ४ सामन्यात बाजी मारली आहे.

 

 

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...