Wednesday, May 21, 2025
Homeजळगावअतिक्रमित घरे नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर करा - पालकमंत्री गुलाबराव पाटील

अतिक्रमित घरे नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव – jalgaon

- Advertisement -

धरणगाव नगरपालिका क्षेत्र, मौजे कुसुंबे व मौजे नशिराबाद येथील अतिक्रमित घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तात्काळ कार्यवाही १५ दिवसांच्या आत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात केळीचा पीक विमा काढलेल्या उर्वरीत ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्राची पडताळणी ऑगस्ट महिन्याच्या आत करण्यात यावी. असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

अजिंठा शासकीय विश्रामगृहात झालेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील या प्रकल्पांच्या प्रस्तावांची सद्यपरिस्थिती, प्रलंबित घरकुलांचा समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर सदरचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगाव नगरपालिका हद्दीतील संजय नगर, नेहरूनगर व गौतम नगर येथील १७५४ अतिक्रमण घरांचा प्रश्न शासन निर्णयानुसार लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा. नशिराबाद येथील गट नंबर २३२० मधील अपूर्ण बांधकाम असलेल्या घरकुले व अतिक्रमित घरकुले नियमित करण्याचा प्रश्न तसेच कुसुंबा येथील गट नंबर २३०/२ व ३१५ मधील अतिक्रमण नियमित करण्यासाठी शक्ती प्रदत्त समितीने तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.‌असे निर्देश ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.ठाकूर यांनी जिल्ह्यातील केळी पीक विम्याच्या सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यापैकी ४४ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राची शेतकऱ्यांनी पडताळणी केली आहे. अद्याप ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्राची पडताळणी बाकी आहे. यावर पालकमंत्री यांनी सूचना दिल्या की, उर्वरित ३७ हजार हेक्टर क्षेत्राची तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या मदतीने पीक विमा कंपनीने तात्काळ पडताळणी करावी.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक; २६ हून...

0
नवी दिल्ली | New Delhi छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नारायणपूर जिल्ह्यातील (NarayanPur District) अबुझदमदच्या जंगली भागात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये (Security Forces and Maoists) चकमक सुरु असून, या...