Tuesday, September 17, 2024
Homeनगरसुनिल तटकरे म्हणाले, “पुन्हा महायुतीचे सरकार येणार अन् अजितदादा…”

सुनिल तटकरे म्हणाले, “पुन्हा महायुतीचे सरकार येणार अन् अजितदादा…”

कोपरगाव | प्रतिनिधी

- Advertisement -

आ. आशुतोष काळे शंभर नाही हजार टक्के निवडून येवून पुन्हा आमदार होणार असून राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येवून अजितदादा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी कोपरगाव येथे व्यक्त केला आहे.अजित पवार यांच्या जन सन्मान रॅलीच्या नियोजनासंदर्भात कोपरगाव मतदार संघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच कोपरगाव येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

तटकरे म्हणाले की, अनेक निवडणुका येतात आणि त्या वेगवेगळ्या राजकीय समीकरणे घेवून येतात. नगर जिल्हा राजकारणाच्या बाबतीत अतिशय जागरूक आणि संवेदनशील जिल्हा आहे. त्याप्रमाणे कोपरगाव मतदार संघ देखील अतिशय जागरूक असून २०१९ ला या मतदार संघातील सुजाण मतदारांनी २०१४ ची चूक दुरुस्त करून आशुतोष काळे यांच्यासारखा उच्च शिक्षित तरूण सहकारी विधिमंडळात पाठवून आपली राजकीय परिपक्वता सिद्ध केली आहे. काळे यांनी परदेशात उच्च शिक्षण घेवून देखील आपल्या मातीची सेवा करण्याचा विचार मनात रुजवून घेत योग्य निर्णय घेतला.

हे ही वाचा : शिंदे गटाचा श्रीरामपूर, नेवासा मतदारसंघांवर डोळा

अजितदादांनी महिला भगिनींसाठी दरमहा १५०० रुपये, शेतकऱ्यांसाठी वीज पंपाच वीज बिल माफ व बारा तास मोफत वीज देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. प्रशिक्षण घेणाऱ्या युवा युवतींना प्रती महिना दहा हजार रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. अशा विविध योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आणल्या आहेत. तसेच अजितदादांनी केंद्र सरकारकडे भूमिका मांडतांना शेतीला पूरक व्यवसायाला दूध व्यवसायास असून राज्य सरकार पाच रुपये त्या ठिकाणी अनुदान देणार आहे. पण परदेशातून दुधाची भुकटी आयात करण्याच्या निर्णयावर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे त्या मागणीची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेवून दखल दुधाची भुकटी आयात करणार नाही असा निर्णय घेतला. असंही ते म्हणाले.

यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, पाच वर्षांमध्ये कोपरगाव मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या आशीर्वादातून भरघोस निधी आणून पूर्ण मतदार संघाचा कायापालट केला असून पुढचा आमदार तर मीच होणार आहे व राज्याचे मुख्यमंत्री देखील अजितदादा होणार आहे. त्यासाठी मी व माझे कार्यकर्ते कामाला लागलो आहोत. विकासाच्या बाबतीमध्ये कोणीही अजितदादांचा कोणी हात धरू शकत नाही हे खरे आहे.

हे ही वाचा : शपथविधीवेळी नार्वेकरांकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख; तर गवळी यांची ‘जय…

अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असून आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यामुळे सर्व कार्यर्त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो जोश व ताकद लावून आपण मला निवडून आणलं त्याच जोशात व त्याच ताकतीने निवडणुकीत उतरून मला निवडून देवून अजितदादांचे हात बळकट करा. विधानसभा निवडणुकीला कालावधी जरी कमी राहिलेला असला तरी या कालावधीमध्ये पाच वर्षात केलेले काम मतदारापर्यंत पोहोचवा. अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना मिळवून या दोन महिन्यांमध्ये मिळवून द्या. विकासकामे भरपूर झालेले आहेत त्याचा फक्त प्रचार प्रसार कराअसे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

कार्यकर्त्यांची ती अपेक्षा मी पूर्ण करीन

सुनील तटकरे यांच्या भाषणातून आ. आशुतोष काळे यांच्या कामाचे कौतुक होत असतांना प्रत्येक वेळी उपस्थित कार्यकर्ते टाळ्या वाजवून दाद देत होते. त्या टाळ्यांचा अर्थ प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी मोजक्याच शब्दात मांडला. ते म्हणाले, मी काही डॉक्टर नाही मात्र कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावना मला स्पष्टपणे समजत आहे.कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेली अपेक्षा अर्थात आ.आशुतोष काळेंना मंत्रीपद ती कार्यकर्त्यांची अपेक्षा मी पूर्ण करीन असे अप्रत्यक्षपणे सुतोवाच त्यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या