Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमJamkhed : मंगल कार्यालयातुन नववधूचे सोन्याचे दागिने चोरीला

Jamkhed : मंगल कार्यालयातुन नववधूचे सोन्याचे दागिने चोरीला

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

येथील मंगल कार्यालयातून नववधूंसाठी (Bride) आणलेले 75 ग्रॅम वजनाचे पावणेचार लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) बुधवारी (दि.14) अज्ञात चोरट्याने चोरुन (Theft) नेले. याप्रकरणी प्रताप कल्याण काकडे (रा. बोर्ले, ता. जामखेड) यांच्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी अधिक माहिती अशी, फिर्यादी काकडे यांच्या दोन मुलांचे लग्न (Wedding Ceremony) जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे बुधवारी होते. लग्न लागल्यानंतर सप्तपदीचा कार्यक्रम होणार होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने (Gold Jewelry) ठेवलेला स्टीलचा डबा लग्नाचे साहित्य ठेवले होते. त्या ठिकाणी ठेऊन काकडे लघुशंकेसाठी गेले. परत आल्यानंतर त्यांना डबा जागेवर दिसून आला नाही. त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र सोने ठेवलेला डबा सापडला नाही. डबा चोरी झाल्याचे समजताच काकडे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे करीत आहे.

सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
मंगल कार्यालयातील लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेत चोरटे सोन्याचे दागिने चोरी करुन हात साफ करतात. विशेष म्हणजे लग्नकार्यास येणार्‍या लोकांच्या दुचाकी देखील चोरटे चोरुन नेत असल्याच्या घटना घडल्या आहेत. जामखेड तालुक्यातील सर्व मंगल कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...