Thursday, May 15, 2025
Homeनाशिकशिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे .शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत आहे.त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी प्रक्रिया बाकी आहे अशा शिधापत्रिकाधारकांनी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील 38 लाख 57 हजार 664 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुरवठा विभागाला देण्यात आले आहे. अंदाजे जिल्ह्यातील 82 टक्के ई- केवायसी प्रकिया पूर्ण झाली आहे.अद्यापही पाच लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारंकाची ई केवायसी प्रकिया अपूर्ण आहे.. शासनाने रेशन धारकांना केवायसी करणे बंधनकारण केले आहे. या शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण करावी अन्यथा रेशन बंद होण्याचा इशारा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे.

शिधापत्रिकाधारकांनी मेरा-केवायसी अ‍ॅप वापरण्याचे आवाहन
ई-केवायसी करण्यासाठी रेशन दुकानात गर्दी होत असल्याने शासनाने मेरा-केवायसी अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवर ओटीपीद्वारे इतर माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व माहिती भरुन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. शिधापत्रिकारधारकांनी 30 एप्रिलपर्यंत ई केवायसी पूर्ण करावी.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...