नाशिक । प्रतिनिधी Nashik
शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे .शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत आहे.त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांची ई- केवायसी प्रक्रिया बाकी आहे अशा शिधापत्रिकाधारकांनी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील 38 लाख 57 हजार 664 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुरवठा विभागाला देण्यात आले आहे. अंदाजे जिल्ह्यातील 82 टक्के ई- केवायसी प्रकिया पूर्ण झाली आहे.अद्यापही पाच लाखांहून अधिक शिधापत्रिकाधारंकाची ई केवायसी प्रकिया अपूर्ण आहे.. शासनाने रेशन धारकांना केवायसी करणे बंधनकारण केले आहे. या शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण करावी अन्यथा रेशन बंद होण्याचा इशारा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे.
शिधापत्रिकाधारकांनी मेरा-केवायसी अॅप वापरण्याचे आवाहन
ई-केवायसी करण्यासाठी रेशन दुकानात गर्दी होत असल्याने शासनाने मेरा-केवायसी अॅप विकसित केले आहे. या अॅपवर ओटीपीद्वारे इतर माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व माहिती भरुन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. शिधापत्रिकारधारकांनी 30 एप्रिलपर्यंत ई केवायसी पूर्ण करावी.