दिल्ली | Delhi
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 विश्वचषकात सध्या पहिल्या फेरीचे सामने सुरू आहेत. मुख्य फेरीला सुरुवात होण्याअगोदर स्पर्धेसाठी मुख्य फेरी दाखल झालेल्या सर्व संघांना प्रत्येकी दोन सराव सामने खेळण्याची संधी देण्यात आली होती.
मात्र, बुधवारी (19 ऑक्टोबर) सराव सामन्यांच्या ठिकाणी पडलेल्या पावसामुळे तीन पैकी एकही सामना पूर्ण होऊ शकला नाही. यामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड हा महत्त्वाचा सामना देखील सामील होता.
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानचा सामना ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर खेळला जाणार होता. भारतीय संघ याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामना खेळली. या मॅचमध्ये भारताने विजय मिळवला होता.
आता भारताचा पुढचा सामना थेट पाकिस्तान विरुद्ध होईल. टी 20 वर्ल्ड कपमधील भारताचा पहिला सामना असेल. मेलबर्नमध्ये २३ ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. पहिल्या सराव सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने कमाल केली होती.