Friday, June 6, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUddhav Thackeray: "थोडे दिवस थांबा, थेट बातमीच देतो..."; मनसे-शिवसेना युतीवर उद्धव ठाकरेंचं...

Uddhav Thackeray: “थोडे दिवस थांबा, थेट बातमीच देतो…”; मनसे-शिवसेना युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | Mumbai
राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसोबतच जनसामान्यांकडून करण्यात येत आहे. या चर्चांचे कारण म्हणजे राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना एक सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहे. दरम्यान युतीच्या चर्चांवर दोन्ही पक्षातील उपनेत्यांकडून प्रतिक्रिया येत असतानाच आता खुद्द उध्दव ठाकरेंनी मोठे विधान केल्याने मनसे-शिवसेना युतीला आणखी जोर धरला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना-मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आला नाही, युतीची चर्चा ही कॅमेरासमोर होत नाही असे मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. तसेच या आधी 2014 आणि 2017 साली अशीच चर्चा झाली होती, त्यामुळे आता ताकही फुंकून प्यावे लागत असल्याचे मनसेनेच्या नेत्यांनी म्हटले होते.

उध्दव ठाकरे काय म्हणाले?
मनसेसोबतच्या युतीबाबत मी संदेश नाही तर थेट बातमीच देईन, असे ठाकरेंनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये याबाबत चर्चा तर सुरू झाली नाही ना किंवा हा निर्णय लवकरच तर जाहीर होणार नाही, असे एक ना अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी या युतीबाबत सकारात्मक उत्तर दिल्याने महापालिका निवडणुकीत युती नक्की हे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राच लक्ष लागले आहे. साद दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे. मनसेकडून सांगितले जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो असेही ते म्हणाले.

युतीसंबंधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यामुळे माझे म्हणणे असे आहे की संदेश वैगेरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ”, असे सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-मनसे युतीकडे पडलेले पुढचे पाऊल असल्याची चर्चा आहे.

अविनाश जाधव काय म्हणाले?
मनसेचे नेते अविनाश देशपांडे म्हणाले की, “ज्यावेळी आमच्याकडे युतीचा ठोस प्रस्ताव येईल त्यावेळी त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. उद्धव ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होईल. परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2014 आणि 2017 सालीही काहीतरी होते. पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हते. त्यामुळे जनतेच्या मनात काहीही असो, उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते महत्त्वाचे.” उद्धव ठाकरे म्हणाले की ते बातमी देणार. त्यामुळे ते काय बातमी देणार याची वाट पाहू असे संदीप देशपांडे म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?
“नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्याने त्याचा परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले असेल. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मुलांच्या जन्माच्या आधीपासून हे भाऊ आहेत”, असे संजय राऊत यांनी आज म्हटले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बिबट्याच्या

भडाणेत बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू; बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

0
चांदवड | प्रतिनिधी तालुक्यातील भडाणे-रायपूर शिवरस्त्यावर गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास मजुरी करून घरी परतणाऱ्या रामदास सिताराम आहेर (वय ४५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला ज्यात...