सटाणा |
- Advertisement -
बागलाण तालुक्यातील ताराहाबाद, नामपूर, ढोलबारे, वीरगाव व परिसरात आज सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान काही ठिकाणी काढणीला आलेल्या पिंकांचे तसेच कांदा पिकाचे अवकाळी पावसाने नुकसान होणार असल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अजून आर्थिक संकट येण्याची चिन्हे दिसू लागली आहे.




