Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याआम्ही तिघे म्हणजे विकासाचा त्रिशूल

आम्ही तिघे म्हणजे विकासाचा त्रिशूल

गडचिरोली । प्रतिनिधी Gadchiroli

शासन आपल्या दारी योजनेतून दिलेल्या लाभानंतर लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावरील समाधान ही सरकारच्या कामाची पावती आहे. विकासाच्या मुद्द्यावर भाजप व शिवसेना एकत्रित आली, आता अजित पवार सोबत आहेत. यानिमित्ताने त्रिशूल तयार झाले आहे. विकासासाठी या त्रिशुलाचा उपयोग होईल, पण सामान्यांच्या विरोधात कोणी काम करत असेल तर त्याला सोडणार नाहीत. शंकर भोळा आहे, पण त्याला तिसरा डोळा आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला.

- Advertisement -

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शनिवारी (8 जुलै) रोजी गडचिरोलीतील पहिल्याच जाहीर कार्यक्रमात सरकारमध्ये सर्व अलबेल असल्याचे सांगितले आहे. तसेच तिघांची एकत्रित शक्ती भविष्यात राजकीय विजयाची नांदी ठरणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

गडचिरोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गडचिरोलीतील ग्रामीण जनतेने मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सत्तेमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच या तिघांनी एका जाहीर कार्यक्रमात एकत्रित हजेरी लावली.

या कार्यक्रमादरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी सहज संवाद साधत असल्याचे पाहायला मिळाले. तर अजित पवार यांनी ही त्यांच्या प्रशासनावरील नियंत्रणाची झलक दाखवल्याचे सांगण्यात येत आहे. या तिघांनी सरकारमध्ये सर्व काही ठीक असल्याचे देखील सांगण्यात येत होतं.

अजित पवारांची तंबी

गडचिरोलीमधील अधिकार्‍यांना गडचिरोलीत राहून जनतेचे काम करण्याची तंबी अजित पवारांनी यावेळी दिली आहे. जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री गडचिरोलीत येतात, तेव्हा मंत्रालयातील सचिवांनी देखील इथे हजर राहायला हवे. प्रशासनातील अधिकार्‍यांनी गडचिरोलीत पोस्टिंग असताना नागपुरात राहून नोकरी करू नये, त्यांनी मुख्यालयात राहिले पाहिजे असे पवार म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दोघांवर जोरदार टीका केली. जेव्हा कष्टकरी आणि क्षमता असलेल्या माणसावर अन्याय होतो, तेव्हा अजित पवारांसारखा प्रसंग घडतो असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तोंडात अंजीर आणि हातात खंजीर असलेल्यांचे काय करायचे हे अजित पवार यांना कळते. घरी बसून काम करणार्‍यांपेक्षा मोकळेपणाने बोलणारे चांगले.अजित पवार तुमच्या नावात जीत आहे. त्यामुळे चिंता नको आपला विजय निश्चित असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या