कोलकाता | Kolkata
पश्चिम बंगाल सरकारविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भाजपाने तृणमूल काँग्रेसविरुद्ध ‘चलो नबन्ना’ मोर्चाचे आयोजन केलं आहे.
या मोर्चात भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळतं आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारी झाली. काही ठिकाणांहून जाळपोळीचे फोटोही समोर आले आहेत.
बडा बाजार पोलिस ठाण्याजवळ पोलिसांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.
पश्चिम बंगालमध्ये 14 सप्टेंबरपासून विधानसभेचे अधिवेशव सुरु होत आहे. यामुळे भाजप या मोर्चाच्या माध्यमातून बॅनर्जी सरकारला घेरत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यात भाजपकडून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप केले जात आहे. या भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली तृणमूलचे पार्थ चॅटर्जी व अनुव्रत मंडल हे दोन बडे नेते तुरुंगात आहेत.