Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशजाणून घ्या, अर्थसंकल्प कसा तयार होतो?

जाणून घ्या, अर्थसंकल्प कसा तयार होतो?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (nirmala sitharaman)1 फेब्रुवारी 2022 रोजी चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करतील. सकाळी 11 वाजता बजेट सादरीकरणास सुरुवात होईल. त्यापुर्वी 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण (economic survey)सादर केला जाईल.

भारताचा अर्थसंकल्प कसा तयार होतो त्याबाबतच्या रंजक गोष्टी…

- Advertisement -

अर्थसंकल्प म्हणजे काय?

केंद्र सरकारच्या आर्थिक हिशेबाला अर्थसंकल्प (Budget) म्हणतात. राज्य घटनेनुसार, सरकारनं दरवर्षाच्या सुरुवातीला संसदेत बजेट सादर करणं आवश्यक आहे. आर्थिक वर्षाचा अवधी चालू वर्षाच्या एक एप्रिलपासून पुढच्या वर्षाच्या 31 मार्चपर्यंत असतो.

अर्थसंकल्प बनवण्याची प्रक्रिया काय?

अर्थसंकल्प बनवण्याची प्रक्रिया संसदेत सादर करण्याच्या सहा महिने आधीपासून सुरू होते. ही मोठी लांबलचक प्रक्रिया असते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांकडून आकडे मागवले जातात. या आकड्यांवरून लक्षात येतं की, त्यांना या वर्षी किती निधीची आवश्यकता आहे. तसेच लोककल्याणाच्या योजनांसाठी किती पैशांची आवश्यकता पडेल. याच हिशेबानं वेगवेगळ्या मंत्रालयांना निधीचं वाटप केलं जातं.

अर्थसंकल्पासाठी महत्वाची भूमिका कोणाची?

अर्थसंकल्प बनवण्यासाठी अर्थमत्र्यांसह अर्थ सचिव, महसूल सचिव आणि खर्च विभागाचे सचिव महत्वाची भूमिका बजावतात. या प्रक्रियेदरम्यान जवळपास रोज त्यांची अर्थमंत्र्यांशी चर्चा करतात.

अर्थसंकल्पात कसला, कसला समावेश असतो?

अर्थसंकल्प म्हणजे मुळातच खर्च आणि महसूल यांचा लेखाजोखा असतो. सरकारच्या खर्चात लोककल्याणासाठीच्या योजनांसाठी दिला जाणारा निधी, लष्कराचा निधी, वेतन आणि घेतलेल्या कर्जाचा व्याज इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

सरकारला महसूल कसा मिळतो?

सरकार टॅक्स लावण्यासह सार्वजनिक क्षेत्रांमधील व्यावसायांमधून कमाई आणि बाँड जारी करून महसूल मिळवतं. महसूल प्राप्तीसाठी कर आणि इतर करविरहित स्रोतांद्वारे रक्कम दाखवली जाते.

वित्तीय तुट काय असते?

महसूल खर्च सरकारच्या प्रत्येक दिवसाचं कामकाज आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर खर्च होतो. जर महसूल खर्च जमा रक्कमेपेक्षा जास्त असेल, तर त्याला वित्ती तुट म्हणतात.

भांडवली अर्थसंकल्प काय आहे?

भांडवली अर्थसंकल्प सरकारला मिळणाऱ्या आणि सरकारकडून चुकवलेल्या व्यवहारांचा लेखाजोखा असतो. यात जनतेसाठी घेतलेल्या कर्जाचा, तसंच परदेशातून आणि आरबीआयकडून मिळालेल्या कर्जाचा समावेश असतो.तसंच, भांडवली खर्चात मिशनरी, अवजार, बिल्डिंग, आरोग्य सुविधा, शिक्षण यांवरील खर्चाचा समावेश असतो. जेव्हा सरकार महसुलापेक्षा जास्त खर्च करतो, तेव्हा वित्तीय तुटीसारखी स्थिती निर्माण होते.

भांडवली अर्थसंकल्प काय?

भांडवली अर्थसंकल्प सरकारला मिळणाऱ्या आणि सरकारकडून चुकवलेल्या व्यवहारांचा लेखाजोखा असतो. यात जनतेसाठी घेतलेल्या कर्जाचा, तसंच परदेशातून आणि आरबीआयकडून मिळालेल्या कर्जाचा समावेश असतो. तसंच, भांडवली खर्चात मिशनरी, अवजार, बिल्डिंग, आरोग्य सुविधा, शिक्षण यांवरील खर्चाचा समावेश असतो. जेव्हा सरकार महसुलापेक्षा जास्त खर्च करतो, तेव्हा वित्तीय तुटीसारखी स्थिती निर्माण होते.

आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय?

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाच्या येत्या आर्थिक वर्षाचा अंदाज मांडण्यात येतो. पण आर्थिक पाहणी अहवाल हा गेल्या आर्थिक वर्षाचा लेखाजोगा असतो. त्यामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेने कशा प्रकारची कामगिरी केली हे सांगितलं जातं. हा आर्थिक पाहणी अहवाल सरकारने संसदेत मांडावा असा कुठल्याही कायद्यात किंवा घटनेत उल्लेख नाही. ही एक परंपरा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या