अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्ह्यात आज ७२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.८६ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ०५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७४४ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा कार्यक्षेत्रातील ०५ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ७२४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १६०, अकोले ३७, जामखेड ४२, कर्जत १९, कोपरगाव २४, नगर ग्रामीण ४२, नेवासा ३६, पारनेर २९, पाथर्डी ३०, राहाता ६८, राहुरी ४३, संगमनेर ५१, शेवगाव ४३, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर ५५, कॅंटोन्मेंट ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०३,इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.