अहमनगर (प्रतिनिधी)-
जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागल्याने 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) , गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी काही वेळापूर्वी ट्विट करून या घटनेबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या. नातेवाईकांना धीर देत जखमी रूग्ण लवकर बरे होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच या दुर्घटनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्राथर्ना केली आहे.
मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागातील आगीच्या घटनेस जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.
अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला असून 7 गंभीर आहेत. या घटनेमुळे नगर जिल्हा हादरला आहे.