अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अवकाळी पावसाने गुरुवारी रात्री 9.30 दरम्यान नगर शहर, उपनगरात आणि एमआयडी परिसरात जोरदार हजेरी लावली. साधारण 20 ते 25 मिनीटे पावसाच्या जोरदार सरी कोसळ्या. शहरात अनेक ठिकाणी वीज गायब झाली. नगर तालुक्यात अनेक गावांत जोरदार वार्यासह पाऊस झाला. या पावसामुळे आंब्यासह फळबागांचे नुकसान झाले आहे.
- Advertisement -
अहमदनगर जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. गुरुवारी सकाळपासूनच आकाशामध्ये ढगांनी गर्दी केली होती. दुपारच्या वेळेस उकाडाही वाढला होता. सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला होता. नऊ वाजण्याच्या सुमारास जोराच्या वार्यासह विजांच्या कडकडाटात सुरुवात झाली. या पावसामध्ये जीवित हानी झालेली नाही.जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात हानी झाली नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे