Sunday, May 19, 2024
Homeजळगावbreaking डोहात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

breaking डोहात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

जळगाव – jalgaon

तालुक्यातील शिरसोली गावाजवळील धारागिर (dharagir) शिवारातील पाण्याच्या डोहात दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

- Advertisement -

शिरसोली गावाजवळ असलेल्या धारागिर शिवारात असलेल्या पाण्याच्या तलावात पोहण्यासाठी जय जालींदर सोनवणे, निलेश राजेंद्र मिस्त्री (वय-१७) आणि सुर्यवंशी शिवाजी पाटील (वय-१५) दोन्ही रा.भोलानाथ नगर, शिरसोली जळगाव हे आज दुपारी पोहण्यासाठी गेले होते. यात पाण्यात पोहतांना निलेश मिस्त्री आणि सुर्यवंशी पाटील यांना पाण्याचा अंदाज न असल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

तर जय सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरीकांना धाव घेत घटनास्थळ गाठले. गावातील विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल्ल या तरूणांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या