Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे-फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा नरमले, व्यक्त केली दिलगिरी!

शिंदे-फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा नरमले, व्यक्त केली दिलगिरी!

मुंबई | Mumbai

बच्चू कडू जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा त्यांनी खोके घेतले होते असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

- Advertisement -

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर राणा यांनी शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच बच्चू कडू यांनाही राणा यांनी आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता. मतभेद झाल्यानंतर माझ्या तोंडातून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्यं निघाली. या वाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. मी बच्चू कडू यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेत आहे. बच्चू कडू यांनीही माझ्याविषयी अपशब्द आणि न पटणारी भाषा वापरली होती. तेदेखील त्यांची ही वक्तव्य माघारी घेतील, असे सांगत अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपली तलवार म्यान केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या