नाशिक | प्रतिनिधी Nashik
दिवाळी हा मांगल्याचा व चैतन्याचा सण ( Diwali Festival-2022 ) म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मात्र समाजात प्रत्येक व्यक्ती आपल्या परिस्थितीमुळे हा उत्सव साजरा करू शकत नाही .
- Advertisement -
अशा गरजूंना अनोखी भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी थोडा जरी प्रयत्न केल्यास खऱ्या अर्थाने उत्सव साजरा केल्याची समाधान मिळते याशिवाय आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो .
याच हेतूने दिवाळी सणाच्या निमित्ताने महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी गरजू मुलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांनी गरजू मुलांना तसेच गावामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी फिरणाऱ्या गरजू महिलांनाही आपल्या घरी बोलावून गोड फराळाची एक अनोखी भेट दिली.त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.