Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रसुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

पुणे | Pune

सांस्कृतिक आणि विद्येचं माहेरघर असे शहर म्हणून ओळखले जाणारे पुण्यामध्ये संतापजनक आणि चीड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. मूल होत नाही म्हणून महिलेला सासरच्यांनी मानवी हाडांची राख खाऊ घातल्याची धक्कादायक घटना पुणे येथील धायरी परिसरात घडली आहे.

- Advertisement -

राज्य महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांना याबाबत तातडीने कारवाई करणायचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

“पुण्यात मूल होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला होता. विद्येचे माहेरघर, जागतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील हा प्रकार निंदनीय, अमानवी आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेतली असून सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तातडीने कार्यवाही करत आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,” असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

घरात सुबत्ता यावी आणि पुत्र प्राप्त व्हावी या साठी घरच्यांनी एका महिलेवर अघोरी पूजा करत या विवाहितेला मृत माणसाची हाडे, घुबडाचे पाय, कोंबडीची अघोरी पूजा करून ही राख पाण्यातून जबरदस्तीने पाजली होती. या प्रकरणी घरातील तब्बल ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भाषणाने मिठी नदी हसली, समुद्र गोड झाला अन् मातीने अश्रू ढाळले

पत्नीला आरोपी पती तसेच घरातील इतर जण संगनमत करुन शारीरिक आणि मानसिक छळ करुन वारंवार मारहाण करुन शिवीगाळ करायचे. हा प्रकार २०१९ पासून सुरु होता. पीडित महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सासरच्या कुटुंबातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यात जादूटोण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांना रोखण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. त्यासंदर्भात काही आढळलं तर तक्रार करण्याचं आवाहनदेखील करण्यात आलं आहे. मात्र तरीही हे प्रकार सातत्याने सुरु असल्याचं समोर येत आहे.

राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

या घटनांमुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी अशी घटना वैकुंठ स्मशानभूमीत समोर आली होती. त्यावेळी पोलीसांनी अघोरी प्रकार करणाऱ्या दोघांना अटक केली होती

अचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्…, पुढं जे घडलं ते थक्क करणारं

- Advertisment -

ताज्या बातम्या