मुंबई | Mumbai
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) भीषण अपघात (Accident News) झाला असून या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला.
मृत प्रवासी हे गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे आहेत. मोहम्मद अब्दुल सलाम हाफिसजी (वय ३६), इब्राहिम दाऊद (वय ६०) आसिया बेन कलेक्टर (वय ५७) इस्माईल महंमद देसाय (वय ४२) अशी अपघात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.
गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला, कॉन्सर्ट दरम्यानच घडला सारा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील महालक्ष्मीजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहुन एक कार मुंबईच्या दिशेनं येत होती. डहाणूजवळ पोहोचले असता अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव लक्झरी बसवर कार आदळली.
डॉक्टरांची कमाल! मेंदूमधून चक्क दगड काढला… वाचा ऑपरेशनची थरारक स्टोरी
हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला आहे. कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. बसचालक या अपघातात जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
‘प्रेमपुजारी’ला ५० वर्ष पुर्ण, आपल्या नगर जिल्ह्याशी आहे खास आठवणी