मुंबई | Mumbai
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Power Struggle) निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. त्यामुळे आता नार्वेकर याप्रकरणी काय निकाल देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे…
राहुल नार्वेकर हे दोन ते तीन दिवसांपूर्वी लंडन दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आज ते लंडन दौऱ्यावरून नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधत १६ आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification of MLA) निर्णयाबद्दल मोठे विधान केले आहे.
Nashik : पिकअपचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी
यावेळी नार्वेकर म्हणाले की, “१६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ज्याकाही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. यामध्ये सर्वप्रथम राजकीय पार्टी कुणाची आहे? याचा निर्णय होणे आवश्यक आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे घटनेतील सर्व तरतुदींचा विचार करूनच योग्य निर्णय घेऊ” असे त्यांनी म्हटले.
‘मविआ’त जागावाटप कसं होणार? अजित पवारांनी सांगितला फॉर्म्युला
तसेच विधानसभा अध्यक्षांनी १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागणीबाबत विचारले असता राहुल नार्वेकर म्हणाले की, “सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाष्यांवर मी टिप्पणी करत नाही. मला तशी टिप्पणी करायची गरजही नाही. त्यामुळे कुणी १५ दिवस, कुणी २० दिवस तर काहींनी दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याची मागणी केली आहे. पण मी याकडे लक्ष देत नाही. मी कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेणार आहे. कुणाच्या मनासारखं व्हावं म्हणून मी निर्णय घेणार नाही. १५ दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली तर १५ दिवसांत निर्णय घेऊ आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागला, तर निर्णय घेण्यास विलंब होईल. कुणाचा आरोपांना घाबरून मी निर्णय घेत नाही.” असे राहुल नार्वेकरांनी सांगितले.