मुंबई – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यांच्या या निर्णयाला बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी टि्वटरद्वारे देशवासियांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी टि्वटर लिहिले आहे, “आज मी तुम्हाला नम्रपणे हात जोडतो, पंतप्रधानांनी सांगितलेले आदेश पाळा, या संचारबंदी ने जीवनदान भेटेल. २१ दिवसांचा संकल्प कोरोनाला नक्कीच पराभूत करेल”.