Friday, May 3, 2024
HomeUncategorizedदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद  

दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद  

जळगाव –

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर  जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी कळविले आहे.

- Advertisement -

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी ३१ मार्च पर्यंत बंद ठेवणेबाबत आदेशित करण्यात आले होते.

परंतु,  शासनाने १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात बंदी   लागू केली आहे.  गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी  १४ एप्रिल पर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी  डॉ.  ढाकणे यांनी दिले आहे.

या आदेशाचे पालन न करणार्‍या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर कायदेशीर कारवाईचाही इशारा दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या