पेठ : तालुक्यातील चोळमुख येथील दुमजली घरास आग लागून संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
येथील तुळसाबाई तुळशीराम पेंढार यांचे दुमजली घर असून दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत संसार पयोगी वस्तू , धान्य , कपडे व सागवानी लाकडे जळून भस्मसात झाली.
- Advertisement -
सुदैवाने आग लागली त्यावेळी घरात कोणी नसल्याने जिवीत हानी टळली. घटनेचा पंचनामा केला असून जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.