येवला । Yeola
तब्बल २० बिघे द्राक्ष बाग तोडणीस आला होता. बागेतच ३५ रुपये किलो प्रमाणे व्यापाऱ्यांशी सौदा झाला. तोड सुरु-झाली. ३ दिवस तोड झाली. अन अचानक लॉक डाऊन झाले. अन सर्व स्वप्ने धुळीस मिळाली. लहान मुलाप्रमाणे सांभाळलेला द्राक्ष बाग तोडणी सुरू होताच अडचणीत सापडला. मात्र हिंमत धरली. सर्वच द्राक्ष वाळवून मनुके करण्याचा निर्णय घेतला. नुकसान भरून निघणार नाही, मात्र खर्च निश्चितच भरून निघाला, असे वनसगाव येथील पदव्युत्तर पदवीधर युवक संदीप कापडी यांनी सांगितले.