मुंबई । Mumbai
सध्या बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. अभिनेता वरुण धवन प्रेयसी नताशा दलालबरोबर विवाह बंधनात अडकणार आहे.
परंतु, त्याआधी त्याच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वरुणच्या कारला शनिवारी रात्री अपघात झाला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, वरुण धवन आज ( २४ जानेवारी) त्याची प्रेयसी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी वरुण आणि नताशाच्या घरातली मंडळी शुक्रवारीच अलिबागला पोहोचले होते. मात्र, काही कारणास्तव वरुणला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो २३ तारखेला त्याच्या कारने अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. याचवेळी वाहतूक कोंडीत सापडलेल्या वरुणच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्याच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे. मात्र, वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही.
दरम्यान, वरुण-नताशाचं लग्न अलीबागच्या मॅन्शनमध्ये होणार आहे. डेव्हिड धवन आणि सलमान खान यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी सलमान खान हजेरी लावणार आहे. तर शाहरुख खानही हजेरी लावणार आहे. त्याचबरोबर करण जोहर या संगीत समारंभात खास परफॉर्मेंस सादर करणार आहे. डेव्हिड धवन आणि सलमान खान यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी सलमान खान हजेरी लावणार आहे. तर शाहरुख खानही हजेरी लावणार आहे. त्याचबरोबर करण जोहर या संगीत समारंभात खास परफॉर्मेंस सादर करणार आहे.
तसेच वरुणचे बॉलिवूड मित्र मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर, रणबीर कपूर, आलिया भट आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वरुणचे बॉलिवूड मित्र मनीष मल्होत्रा, सारा अली खान, अर्जुन कपूर-मलाइका अरोरा, जाह्नवी कपूर-खुशी कपूर, कतरिना कैफ, नीतू कपूर, कियारा अडवाणी, अनिल कपूर, रिया कपूर, रणबीर कपूर, आलिया भट आणि हर्षवर्धन कपूर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या लग्नात डेव्हिड धवन यांनी करोनाचे प्रोटोकॉल पालन करण्याचे ठरवले आहे. तसेच स्टाफ मेंबरला फोनचा वापर न करण्याचे आदेश दिले आहे. या शानदान लग्नासोहळा उरकून नताशा- वरुन मुंबईत दाखल होत एक भव्य रिसेप्शन सोहळा ठेवला आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या रिसेप्शन सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांना आमंत्रित केले जाणार आहे. या लग्नात डेव्हिड धवन यांनी कोरोनाचे प्रोटोकॉल पालन करण्याचे ठरवले आहे. तसेच स्टाफ मेंबरला फोनचा वापर न करण्याचे आदेश दिले आहे. या शानदान लग्नासोहळा उरकून नताशा- वरुन मुंबईत दाखल होत एक भव्य रिसेप्शन सोहळा ठेवला आहे. मुंबईत पार पडणाऱ्या या रिसेप्शन सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांना आमंत्रित केले जाणार आहे.