मुंबई | Mumbai
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर स्थिती उद्भवली असून अनेक भागात पाणी साचले आहे. भूस्खलन (Landslide) तसेच वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे…
मुसळधार पावसामुळे (Rain) रस्ते पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्रात पावसामुळे आतापर्यंत 102 लोकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी युवासैनिकांना ट्विट करत एक आवाहन केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आताच्या राजकीय परिस्थितीकडं लक्ष न देता, जिथं-जिथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा भागांत शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा, असं त्यांनी आवाहन केलंय. सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडंच आशेनं पाहत आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची ‘हीच ती वेळ’ आहे.
दरम्यान उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला (Shivsena) पुन्हा नव्याने ऊर्जा देण्यासाठी जिल्हा निहाय दौरा सुरु केला आहे. सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु असून अनेक जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे आदित्य ठाकरेंनी युवासैनिकांना हे आवाहन केले आहे.