Thursday, May 2, 2024
Homeनगरअहमदनगर : उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतुकीत बदल

अहमदनगर : उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतुकीत बदल

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक यादरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून कोठी चौक याठिकाणी पाण्याचे पाईपलाईनचे काम करावयाचे प्रस्तावित झालेले आहे. हे काम दोन टप्यांमध्ये पुर्ण करण्यात येणार असल्याने त्या कालावधीत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.

पहिल्या टप्प्यात 20 व 21 जून या कालावधीत नगरकडून पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक कोठी चौक येथून – मार्केटयार्ड भाजी मार्केट- महात्मा फुले चौक-सक्कर चौक मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच दुसर्‍या टप्यासाठी पुणेकडून नगरकडे येणारी सर्व प्रकारची वाहतुक 22 जून ते 28 जून या कालावधीत सक्कर चौक येथून टिळकरोड- आयुवेदिक कॉलेज कॉर्नर- नेप्ती नाका- दिल्ली गेट- अप्पु हत्ती चौक-पत्रकार चौक- एसपीओ चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

22 ते 28 जून या काळात हातमपुरा ते कोठी चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. तसेच शहरातील बाजारपेठेत माल खाली करणारे अवजड वाहनांना चांदणी चौक ते सक्कर चौक दरम्यान प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. एसटी बसेस एसपीओ चौक- पत्रकार चौक- दिल्ली गेटे- नेप्तीनाका- टिळकरोड- सक्कर चौक या मार्गाचा वापर करतील. एसटी बसेस यांना मार्केट यार्ड चौक ते चांदणी चौक दरम्यान प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. याबाबत कोणाच्या काही हरकती असल्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे 17 जून रोजीपर्यंत कळवावे असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या